24.7 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeराष्ट्रीयलष्कराच्या ताफ्यावर अतिरेक्यांचा हल्ला

लष्कराच्या ताफ्यावर अतिरेक्यांचा हल्ला

४ जवान शहीद, परिसराला लष्कराचा वेढा

जम्मू : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली. या घटनेत ४ जवान शहीद झाले आहेत, तर इतर ४ जण जखमी झाले. आपल्या जवानांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानांनी कठुआ जिल्ह्यात वेढा दिला असून, या भागात अजूनही चकमक सुरू आहे.

जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात मशेडी भागात लष्करी जवानांच्या ताफ्यावर हा हल्ला झाला. हा भाग भारतीय लष्कराच्या ९ क्रॉप्स अंतर्गत येतो. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर आपल्या जवानांनीदेखील त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या ताफ्यात एकूण किती जवान होते, याची माहिती कळू शकलेली नाही. पण यामधील चार जवान शहीद झाले, तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवानांनीदेखील दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पण त्यात किती दहशतवादी मारले गेले, हे अद्याप कळू शकलेले नाही.

दरम्यान, हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने आजूबाजूच्या परिसराला वेढा घातला असून दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांनी केलेला हा नियोजित हल्ला असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस आणि सुरक्षा दलाचे पथक मच्छेडी परिसरात शोध मोहीम राबवत होते. हे दहशतवाद्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी हल्ल्याचे नियोजन केले असल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांनी अचानक हल्ला करत मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. त्यामुळे दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अधिक सुरक्षा दल पाठवण्यात आले.

वाहनावर फेकले ग्रेनेड
कठुआच्या डोंगराळ रस्त्यांवरून लष्कराची वाहने जात होती. त्याच वेळी वाहनावर ग्रेनेड फेकण्यात आले. हल्ल्याची माहिती मिळताच लष्कराच्या तुकडीने आणि पोलिसांच्या पथकाने आजूबाजूच्या परिसराला वेढा घातला. त्याचबरोबर जवळपासच्या लष्कराच्या चौक्यांनाही अलर्ट मोडवर ठेवण्यात आल्या असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR