25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीययुवकाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकून मारहाण

युवकाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकून मारहाण

पाटणा : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनेकदा माणूसकीला काळिमा फासणा-या गुन्हेगारीच्या घटना घडतात. कौटुंबिक हिंसाचारात टोकाची पाऊले उचलल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यातच, आता बिहारच्या अररिया येथील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हीडीओ तुफान व्हायरल झाला असून व्हीडीओ पाहून नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे.

त्यामध्ये, एका युवकाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकून अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या युवकावर बाईक चोरीचा आरोप असल्याचे व्हीडीओतील संवादावरुन दिसून येते. चोरीच्या आरोपातून युवकास पकडल्यानंतर स्थानिकांनी ही शिक्षा दिली. मात्र, त्यांचे हे कृत्य माणूसकीला काळिमा फासणारे असल्याने नेटीझन्कडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच, पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशीही मागणी केली जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हीडीओ पाहून नेटीझन्सने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेतील आरोपींवर मोठी कारवाई करावी, अशीही मागणी केली जात आहे.

सोमवार २६ ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून पोलिसांनी व्हायरल व्हीडीओची खात्री केल्यानंतर याबाबत माहिती दिली. बिहारच्या अररिया येथील ही घटना असून चोरीच्या आरोपात पकडलेल्या युवकासोबत हे कृत्य घडले आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर, इतरांच्याबाबतीत पोलिसांकडून तपास सुरू असून कारवाई केली जात आहे, असेही बिहार पोलिसांनी ट्विटर हँडलवरुन माहिती देताना म्हटले आहे. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवरुन आता विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. विरोधकांनी नितीश कुमार सरकारला प्रश्न विचारत एनडीए सरकारला लक्ष्य केले आहे. आरजेडी प्रवक्ता मृत्यूंजय तिवारी यांनी म्हटले की, हे कोणते राज्य आहे, या महाजंगलराजमध्ये महाआरोपी राज कायम आहे. बिहारमध्ये शासन आणि प्रशासनाचा वचक राहिलेला नाही असेही राजेडीच्या ट्विटर हँडलवरुन म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR