26.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरकिरकोळ बाजारात कोथिंबीर खातेय भाव

किरकोळ बाजारात कोथिंबीर खातेय भाव

लातूर : प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसापासून शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस व रीमझीम लावलेली हजेरी यामुळे शहरातील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरची आवक घटली आहे. सध्या बाजारपेठेत कोथिंबीरीची आवक घटली असून कोथिंबीर किरकोळ बाजारात भाव खात आहे.

गेल्या आठ दिवसापासून पडत असलेल्या पावसाच्या सततधारेमुळे शहरातील बाजारपेठेतील कोथिंबीरची आवक ५० टक्क्यांनी घटली असल्याचे व्यापा-यांनी सागीतले. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेली कोथिंबीर पाणी लागुन सडल्याने किरकोळ बाजारातही कोथिंबरी दिसेनासी झाली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोथिंबीरचे पिक घेतले जाते. अनेक शेतकरी तसेच भाजीपाला व्यवसायदार या पिकाकडे नगदी उत्पन्न मिळणारे पिक म्हणून पाहतात. जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातून शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक होत असते. गेल्या काही दिवसापासून ही आवक मंदावली आहे. सकाळच्या नाशत्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कोणत्याही पदार्थाची लज्जत वाढवणारी कोथ्ािंबीर सध्या चागलाच भाव खात असून किरकोळ बाजारात ३२० रुपयाच्या भावाने विकली जात आहे. त्यामुळे गृहिणीचे भाजीपाल्याचे रोजचे बजेट कोलमडले आहे. शहरातील विविध भाजी बाजारात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळत असला तरी ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे.

कोथ्ािंबीर ही प्रत्येकाच्या घरात वापरलीच जाते. पण आता याच कोथ्ािंबिरीचा दर गगनाला भिडला असून कोथ्ािंबीर एक पेंडी थेट १०० रुपयांना विकली जात आहे. शहरातील बाजार समिती ५० टक्के कोथिंबीरची आवक झाली आहे. कोथिंबीरची आवक घटल्याने किरकोळ बाजारात भाव तेजीत आहेत. अशातच सर्वच भाज्यांत वापरल्या जाणा-या कोथिंबीरने उच्चांक गाठला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR