23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयपाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा

पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा

कलम ३७० वरून ओमर अब्दुल्लांचे प्रत्युत्तर

श्रीनगर : कलम ३७० बाबत पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या विधानाला नॅशनल कॉन्फ्ररन्स ओमर अब्दुल्ला यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा. त्यांना आमच्या निवडणुकांवर वक्तव्ये करण्याची आवश्यकता नाही. आमचे पाकिस्तानशी काही घेणे-देणे नाही. आम्ही पाकिस्तानमध्ये राहत नाही. काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. तसेच त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा पाकिस्तानला कुठलाही अधिकार नाही, असे ओमर अब्दुल्ला यांनी ठणकावून सांगितले.

काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान, पाकिस्तानने काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे समर्थन केल्यानंतर भारतात राजकारण पेटले होते. तसेच भाजपाने या मुद्यावरून काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्सवर टीका करण्यास सुरुवात केली होती. त्याला ओमर अब्दुल्ला यांनी थेट शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा. त्यांना आमच्या निवडणुकांवर वक्तव्ये करण्याची आवश्यकता नाही. आमचे पाकिस्तानशी काही घेणे-देणे नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, काश्मीरमध्ये कलम ३७० आणि ३५ ए पुन्हा लागू करण्याच्या मुद्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्स आघाडी ही एकमेकांसोबत आहे, असा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला होता.

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आसिफ यांनी जियो न्यूजचे पत्रकार हामिद मीर यांच्याशी बोलताना सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० आणि कलम ३५ ए पुन्हा लागू करण्याच्या मुद्यावर पाकिस्तान आणि नॅशनल कॉन्फ्रन्स-काँग्रेस आघाडी हे एकत्र आहेत असा दावा त्यांनी यावेळी केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR