22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रगडकरी यांना भाजपने साईडलाईन केले

गडकरी यांना भाजपने साईडलाईन केले

सुप्रिया सुळे यांच्या विधानाने खळबळ

पुणे : राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे काल बारामतीच्या दौ-यावर होत्या. यावेळी कार्यकर्त्यांशी तसेच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानामुळे मोठी खळबळ माजली आहे. त्यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्याबद्दल हे विधान केले आहे. ‘ नितीन गडकरी चांगले काम करत आहेत. पण गडकरींना साईडलाइन केले’ असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ माजली आहे.

दरम्यान, अजित पवार फडणवीस आणि शिंदे गटासोबत गेल्यापासून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट, असे दोन ग्रुप पडले. त्यातच निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय दिलाय यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या,‘ नितीन गडकरी चांगल काम करतात . ते भाजपमध्ये आहेत पण आम्हाला प्रेम देतात. ते दुस-या पक्षात असले तरी जे चांगलंय त्याला चांगले म्हटले पाहिजे’ असे त्या म्हणाल्या. एवढंच नव्हे तर ‘गडकरींना साईडलाईन केले’ असे मोठे विधानही त्यांनी केले. यावेळी त्या देवेंद्र फडणवीसांबद्दलही बोलल्या. जनता, देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागत आहे. मला त्यांचे वाईट वाटतं बिचारे १०५ आमदार आले आणि १० मार्क असताना ५ कमी केले आणि डीसीएम ( उपमुख्यमंत्री) केले. परत दोन डीसीएम केले अडीच मार्कवर आणले. १० पैकी अडीच मार्क सांगा मग पास की नापास? असा सवाल त्यांनी विचारला.

बारामती दौ-याबद्दलही त्या बोलल्या. बारामती मतदार संघातील लोक अनेक कामे घेऊन मुंबईत येत असतात, त्यामुळे मी बारामतीत नागरिकांना येऊन भेटते. बारामती लोकसभा मतदारसंघापुढे पाणी,बेरोजगारी आणि हमीभाव ही मोठी आव्हाने उभी आहेत. मी सातत्याने पाण्याच्या टँकरची मागणी करीत आहेत..याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांना घेऊन लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकार हे शेतक-यांच्या विरोधातले
बारामती लोकसभा मतदारसंघापुढे पाणी,बेरोजगारी आणि हमीभाव ही मोठी आव्हाने उभी आहेत. राज्यात देखील बेरोजगारी मोठ्या संख्येने वाढत आहे शेतीला हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.. रूरल इंडियाचा डेटा सांगतो हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. शेतक-यांच्या दुधाला मिळणारा हमीभाव शेतक-यांना मिळाला का ? हे सरकार शेतक-यांच्या विरोधातले आहे. पक्ष फोडणं, घरं फोडणं एवढंच काम सरकार करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. सगळ्यात जास्त पैशाचा घोळ पेटीएम च्या माध्यमातून होत आहे, हे आरबीआयचा डेटा सांगतो..

कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्न
यावेळी त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरही प्रश्न उपस्थित केला. राज्यात जर महिलांना मारहाण होत असेल, जर राज्यात वकील डॉक्टर,पत्रकार, सुरक्षित नसतील ? तर मग देवेंद्र फडवणीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. एखाद्या पोलीस ठाण्यात एखादा आमदार त्याच्या त मित्र पक्षातील सहकार्याला गोळी घालतो आणि केवळ त्यांनी पैसे घेतले म्हणून गोळ्या घातल्या असे सांगतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR