22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रउमेदवार बदला ; भाजपाचा शिंदेंवर दबाव

उमेदवार बदला ; भाजपाचा शिंदेंवर दबाव

८ पैकी २ जागांवर उमेदवार बदलणार?

मुंबई : महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या अंतिम टप्प्यावर असल्याचे सांगितले जात असतानाच आता महायुतीसमोर उमेदवार बदलावा लागण्याचे नवीन आव्हान उभे राहिल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाने जाहीर केलेल्या ९ जागांपैकी २ जागांवरील उमेदवार बदलला जाईल अशी जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातील माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीच दिली आहे. संजय शिरसाट यांनी एखादा उमेदवार कमजोर वाटत असल्यास मुख्यमंत्री तो उमेदवार कधीही बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही असे म्हटले होते.

याच पार्श्वभूमीवर हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्याबरोबरच हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांची उमेदवारी रद्द करून नवे उमेदवार दिले जाण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणी दुसरे उमेदवार देण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून एकनाथ शिंदेंवर दाबव टाकला जात आहे की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

फडणवीसांचे सूचक विधान
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हिंगोलीमधील उमेदवारासंदर्भात सूचक विधान केल्याचे सांगितले जात आहे. येथील उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा शिवसेनेचा असून निवडून येणारा उमेदवार सुचवण्याचे काम आपण करू शकतो. प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळावा, असे निर्देश फडणवीस यांनी पदाधिका-यांना दिल्याचे समजते.

एकूण ३ उमेदवार बदलण्याची चर्चा
संजय शिरसाट यांनीही थेट हिंगोली आणि हातकणंगले मतदारसंघाचा उल्लेख करत उमेदवार बदलले जाऊ शकतात असे म्हटले आहे. दिलेला उमेदवार कमजोर असल्यासारखे वाटले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवार बदलू शकतात असे शिरसाट म्हणाले. त्यांनी यासंदर्भात बोलतानाच हिंगोली किंवा हातकणंगलेचा अथवा दोन्ही जागांवर हे असं काहीतरी होऊ शकतं असं शिरसाट यांनी स्पष्टपणे थेट मतदारसंघाचा उल्लेख करत म्हटले. सध्या सुरू असलेल्या चर्चांनुसार हिंगोली आणि हातकणंगलेबरोबरच यवतमाळ-वाशिमचा उमेदवारही बदलला जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR