22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रसमृद्धीवर पुन्हा अपघात; तिघांचा मृत्यू

समृद्धीवर पुन्हा अपघात; तिघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर भरधाव कार अज्ञात वाहनावर धडकून भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की चार चाकी वाहनाचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात अब्दीमंडी गावाजवळ मुरमुरा फॅक्टरीशेजारी मुंबई लेन येथील समृद्धी महामार्गावर शनिवारी रात्री बाराच्या सुमारास घडला.

शिवाजी थोरात (वय ५८, रा. द्वारका नगर, हडको), राहुल आनंद निकम (वय ४७, रा. हडको), अण्णा रामराव मालोदे (वय ७१) असे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही शनिवारी रात्री एमएच २० ई ई ०७४५ या चारचाकी वाहनाने छत्रपती संभाजीनगर येथून नाशिककडे नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते. संभाजीनगरवरून निघाल्यानंतर अब्दी मंडी गावाजवळ मुरमुरा फॅक्टरीशेजारी मुंबई लेनवर समृद्धी महामार्गावर भरधाव वेगात असलेली कार अज्ञात वाहनाला पाठीमागून धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की चारचाकी वाहनाचा यामध्ये अक्षरश: चुराडा झाला. यामध्ये कारमध्ये असलेल्या तिघांचा मृत्यू झाला.

पसार वाहनाचा पोलिस घेतायत शोध
दरम्यान, समृद्धी महामार्गावर झालेल्या या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. मृतांना तात्काळ रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात ज्या वाहनाला धडकून कारचा अपघात झाला ते वाहन घटनास्थळावरून पसार झाले होते. सध्या पोलिस या वाहनाचा शोध घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR