रांची : भारताने चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने दिलेले १९२ धावांचे आव्हान ५ विकेट्सच्या मोबदल्यात पार करत मालिका खिशात टाकली. भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी मिळवली आहे.
भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्माने ८४ धावांची सलामी दिली. मात्र इंग्लंडच्या फिरकीपटूंनी त्यानंतर भारताची अवस्था ५ बाद १२० धावा अशी केली होती. मात्र शुभमन गिलने संघ अडचणीत सापडला असताना संयमी अर्धशतकी खेळी केली. त्याला ध्रुव जुरेलने उत्तम साथ देत ३९ धावा करत ७२ धावांची भागीदारी रचली.