नवी दिल्ली : समुद्री चाचे सातत्याने मालवाहू जहाजाला लक्ष्य करत आहेत. अशातच हिंदी महासागरात यावेळी त्यांनी एमव्ही अब्दुल्ला या बांगलादेशी मालवाहू जहाजाचे अपहरण केले होते. सोमालियाची राजधानी मोगादिशूपासून ६०० मैल पूर्वेला ही घटना घडली.
हे जहाज मोझांबिकमधील मापुटो बंदरातून संयुक्त अरब अमिरातीमधील अल हमरिया बंदराकडे जात होते. ज्यामध्ये सुमारे ५८ हजार टन कोळसा होता.
दरम्यान या घटनेची माहिती भारतीय नौदलाला कळाल्यानंतर तात्काळ प्रतिसाद देत, आपली युद्धनौका आणि एक लांब पल्ल्याचे सागरी गस्ती विमान तैनात केले आणि त्याची सुटका केली.
भारतीय नौदल मिशनने एमव्ही अब्दुल्ला जहाजावरील समुद्री चाचांच्या हल्ल्याला एक युद्धनौका आणि एलआरएमपी तैनात करून प्रत्युत्तर दिले, असे नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे.