23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रलसणाची नवी आवक घटली; दिवाळीपर्यंत भाव खाणार

लसणाची नवी आवक घटली; दिवाळीपर्यंत भाव खाणार

सांगली : सुमारे वर्षभरापूर्वी ४०० ते ५०० रुपये किलोवर जाऊन सर्वसामान्यांना घाम फोडणा-या लसणाने आता पुन्हा एकदा दरवाढीची मोठी झेप घेतली आहे. सध्याच्या ऐन सणासुदीच्या दिवसांत तो ४०० रुपये किलोवर जाऊन पोहोचला आहे. १०० रुपयांत अवघा पाव किलो लसूण खरेदी करताना गृहिणींचे बजेट ढासळू लागले आहे. जुन्या लसणाची आवक संपली आहे.
गेल्या साडेतीन महिन्यांपासून पावसाने ठिय्या मारल्याने नवा लसूण बाजारात आलेला नाही. त्यामुळे उपलब्ध बाजारात लसणाचे भाव झपाट्याने वाढले आहेत.

व्यापा-यांनी सांगितले की, यावर्षी संपूर्ण देशभरातच लसणाचे उत्पादन खालावले आहे. मे महिन्यापासूनच पावसाने जोर धरल्याने नवी लावण लांबली किंवा कमी झाली. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला.सामान्यत: जानेवारी ते मे दरम्यान नवीन लसणाचे उत्पादन होते. पण यंदा त्याचा साठा लवकरच संपला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि हिमाचल प्रदेशातून येणारा लसूणही घटला आहे.

दिवाळीपर्यंत तेजीत
नवा लसूण बाजारात येण्यास नोव्हेंबर उजाडू शकतो, त्यानंतरच दर कमी होण्याची शक्यता आहे. याच काळात महाराष्ट्रात सणांची धांदल सुरू असते. त्यामुळे मागणी तेजीत राहून दरदेखील कडक राहू शकतात. नवा माल बाजारात आलेला नाही. शेतक-यांकडेसुद्धा शिल्लक नाही. सततच्या पावसाने हा परिणाम झाला झाल्याने लसूण महाग झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR