24.9 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeक्रीडाआयपीएलच्या प्रत्येक सामन्यासाठी आता खेळाडूंना पैसे मिळणार

आयपीएलच्या प्रत्येक सामन्यासाठी आता खेळाडूंना पैसे मिळणार

जय शाहांची मोठी घोषणा

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील जनतेला विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहे. त्यामुळे, विधानसभेचा मोठा इव्हेंट झाल्यानंतर पुढच्यावर्षी आयपीएलचा हंगाम येत आहे. आयपीएल २०२५ चा हंगाम अजून दूर आहे, पण संघांनी तयारी सुरू केली आहे. याबाबत बीसीसीआयकडून लवकरच रिटेनशन पॉलिसी जारी करण्यात येणार आहे.

आयपीएलचा सध्याचा चॅम्पियन संघ केकेआर म्हणजेच कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या नवीन मार्गदर्शकाची घोषणा केली आहे. वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक ड्वेन ब्राव्हो आता त्यांचा नवा मार्गदर्शक असणार आहे. एकीकडे संघांकडून तयारी सुरू असतानाच आता बीसीसीआय देखील तयारीला लागली असून बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आयपीएलच्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आता प्रत्येक सामन्यांसाठी आयपीएल खेळाडूंना पैसे मिळणार आहेत.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची आज बंगळुरू येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये आगामी आयपीएल हंगामाबद्दल महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलमध्ये सहा सदस्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये आयपीएल चेअरमन अरुण धुमाळ, बीसीसीआय सचिव जय शाह आणि बीसीसीआय कोषाध्यक्ष आशिष शेलार आहेत. विशेष म्हणजे बीसीसीआयची वार्षिक बैठक देखील उद्या २९ सप्टेंबर रोजी फोर सीझन हॉटेलमध्ये होत आहे. ज्यामध्ये भारतीय क्रिकेटमधील प्रमुख व्यक्ती उपस्थित राहतील. दरम्यान, आजच्या बैठकीनंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे.

आयपीएल हंगामांचे सातत्य टिकवण्यासाठी आणि उत्कृष्ट कामगिरीचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही आमच्या क्रिकेटपटूंसाठी मानधनात वाढ करत असल्याचे जय शाह यांनी म्हटले. त्यानुसार, आता आयपीएल खेळणा-या क्रिकेटर्संना प्रत्येक सामन्यासाठी ७.५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच, आयपीएलच्या एका हंगामात सर्व साखळी सामने खेळणा-या क्रिकेटपटूला त्याच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त १ कोटी ५ लाख रुपये बोनसही मिळेल. त्यामुळे, आयपीएल क्रिकेटर्स आणखी मालामाल होणार आहेत.

जय शाह यांनी प्रत्येक फ्रँचायझीला एका हंगामासाठी मॅच फी म्हणून १२.६० कोटी रुपये देण्यात येतील, अशीही घोषणा आपल्या ट्विटरवरुन केली आहे. कढछ आणि खेळाडूंसाठी हे एक नवीन युग आहे, असे म्हणत जय शाह यांनी ही ऐतिहासिक घोषणा केली आहे. त्यामुळे, अगोदरच कोट्यवधींची बोली लागून कोट्याधीश झालेल्या आयपीएल खेळाडूंवर आणखी पैशांचा पाऊस पडणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR