22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeक्रीडाअंतिम सामन्यावर पावसाचे सावट?

अंतिम सामन्यावर पावसाचे सावट?

चेन्नई : आयपीएल २०२४ चा किताब उंचावण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. रविवारी होत असलेल्या या सामन्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. तर केकेआरने हैदराबादला पराभवाची धूळ चारून अव्वल स्थान कायम राखले. रविवारी २६ मे रोजी चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाणार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे.

कोलकाता-हैदराबाद या आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यासाठी चेन्नईचे एम. चिदंबरम स्टेडियम सज्ज झाले आहे. परंतु, शनिवारी संध्याकाळी ४.४५ वाजता पावसाने हजेरी लावल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. पावसाने केलेल्या बॅटिंगमुळे केकेआरच्या संघाला सराव करता आला नाही. केकेआरचे शिलेदार आपला सराव अर्धवट सोडून परतले. खरे तर पावसामुळे रविवारी अंतिम लढत झाली नाही, तर हा सामना राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी खेळविण्यात येईल.

दरम्यान, मागील वर्षी अर्थात आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्यात पावसाने बॅटिंग केली होती. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हा सामना रात्री उशीरापर्यंत चालला. अखेर अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात चेन्नईने बाजी मारून सहाव्यांदा आयपीएल जिंकण्याची किमया साधली. गुजरातला सलग दुस-यांदा किताब जिंकण्यात अपयश आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR