23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रराज्याचा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के

राज्याचा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के

यंदाही मुलींनीच मारली बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ९३.३७ टक्के एवढा लागला आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात २.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही निकालात मुलांपेक्षा मुलीच अव्वल ठरल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षी राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल २५ मे रोजी जाहीर केला होता. यंदा त्या तुलनेत चार दिवस आधीच निकाल जाहीर करण्यात आला आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला आहे. यावेळी सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर उपस्थित होते. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल ९७.५१ टक्के. सर्वांत कमी निकाल (९१.९५ टक्के) मुंबई विभागाचा लागला आहे.

मुलींची टक्केवारी – ९५.४४
मुलांची टक्केवारी – ९१.६०
मुलींचा निकाल मुलांपेक्षा ३.८४ टक्क्यांनी अधिक आहे.
विभागनिहाय निकाल
पुणे : ९४.४४
नागपूर : ९२.१२
संभाजीनगर : ९४.०८
मुंबई : ९१.९५
कोल्हापूर : ९४.२४
अमरावती : ९३
नाशिक : ९४.७१
लातूर : ९२.३६
कोकण : ९७.५१

कुठे पाहता येणार निकाल?

mahresult.nic.in
https://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR