26.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रविशाळगड हिंसाचार प्रकरणी कठोर कारवाई करा

विशाळगड हिंसाचार प्रकरणी कठोर कारवाई करा

आमदार रईस शेख यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी
किल्ले विशाळगड येथील हिंसाचाराच्या अनुषंगाने समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाला पत्र लिहून महाराष्ट्र सरकारकडून घटनेचा सद्यस्थिती अहवाल मागविणायची आणि हिंसाचार करणा-यांवर कठोर कारवाई करून बाधितांना उचित नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

आयोगाला लिहिलेल्या पत्रात शेख यांनी म्हटले आहे की, कोल्हापुरातील विशाळगड येथे अतिक्रमणविरोधी मोहिमेच्या नावाखाली हिंसाचार आणि अत्याचारांना चिथावणी देण्याच्या उद्देशाने कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या संघटनांनी कट रचला होता.

यात अल्पसंख्याकांना गंभीर दुखापत आणि इजा झाली आहे. अतिक्रमण संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हा हिंसाचार घडला आहे, असेही ते यावेळी पत्रातून म्हणाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR