22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयआता इकडे-तिकडे जाणार नाही : नितीश कुमार

आता इकडे-तिकडे जाणार नाही : नितीश कुमार

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारच्या औरंगाबादमध्ये होते. त्यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन यावेळी केले. व्यासपीठावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित होते. नितीश कुमार आपल्या भाषणात असे काही बोलले की पंतप्रधान जोरजोरात हसायला लागले. नितीश कुमार म्हणाले तुम्ही याआधीही इथे आलात पण आम्ही गायब झालो, पण आता आम्ही पुन्हा इकडे-तिकडे जाणार नाही असे आश्वासन देतो, जेव्हा नितीश कुमार यांनी पीएम मोदींना खूप काम सुरू आहे, ते लवकर पूर्ण करेन असे म्हटल्यावर मोदी हसायला लागले. नितीश पुन्हा हसले आणि म्हणाले, तुम्ही इथे आलात याचा आम्हाला खूप आनंद आहे, तुम्ही आधी आला होता आणि इथे आम्ही गायब झालो होतो. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आता आम्ही इकडे तिकडे जाणार नाही. आम्ही फक्त तुमच्यासोबत राहू.

नितीश कुमार यांनी अलीकडेच महाआघाडीशी संबंध तोडून भाजपासोबत सरकार स्थापन केले आहे. त्यांनी एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पीएम मोदींचा बिहार दौरा खूप दिवसांपासून ठरला होता. नितीश कुमार म्हणाले की आम्ही २००५ पासून एकत्र आहोत. आम्ही सतत किती काम केले याची मोजदाद करत आहोत. याआधी एकही काम झाले नाही, कोणी अभ्यास करत नव्हते, मात्र आम्ही एकत्र येऊन २००५ पासून सर्व काम केली आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की बिहार पुढे जावो ही आमची इच्छा आहे. तुम्ही राज्यासाठी काम करत आहात, प्रत्येक व्यक्तीचे कल्याण व्हावे आणि सर्वांनी पुढे जावे. नितीश हसत हसत म्हणाले, “मला खूप आनंद झाला आहे की आज पंतप्रधान आले आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मोदीजी बिहारमध्ये येतच राहतील. नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींच्या अबकी बार ४०० पार या घोषणेचा पुनरुच्चार केला. यावेळी तुम्ही किमान ४०० जागा जिंकाल असा आम्हाला विश्वास आहे असे देखील म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR