22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रकालपर्यंतचे भ्रष्ट आज पुजनीय कसे?

कालपर्यंतचे भ्रष्ट आज पुजनीय कसे?

मुंबई : ‘जो नेता तुमच्यासाठी कालपर्यंत भ्रष्टाचारी होता, तो नेता आता भाजपमध्ये कसा काय चालतो, कालपर्यंत भ्रष्ट असणारे आज पुजनीय कसे झाले? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला विचारला आहे.
दरम्यान, सुमारे चार दशकांहून अधिक काळ काँग्रेस पक्षात राहून, विविध पदे भूषवून, अगदी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्यााच बहुमान देणा-या काँग्रेसचा हात सोडून काळानुरूप नवा पर्याय पाहिला पाहिजे, असे सांगत ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

त्यांच्या प्रवेशावर नाना पटोले यांनी टीका करत म्हणाले, एकतर भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मुर्ख समजतात. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत, असा आरोप भाजपने वारंवार केला. त्यानंतर भाजपने अशोक चव्हाण यांच्यामागे ईडी, सीबीआय यांचा ससेमिरा लावला. अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपात दाखल झाले, हा कृतीचा परिणाम आहे.

आता प्रश्न असा आहे की, कालपर्यंत जे तुम्हाला भ्रष्ट वाटत होते त्यांनी नेमके असे काय पुण्य केले ते अचानक तुम्हाला पुजनीय वाटू लागले? निर्लज्जपणाची देखील काहीतरी एक सीमा असते, अशआ शब्दात नाना पटोले यांनी भाजपवर बोचरा वार केला आहे.

जाचाला कंटाळून पक्षप्रवेश
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत, असा आरोप भाजपने वारंवार केला. त्यानंतर भाजपने अशोक चव्हाण यांच्यामागे ईडी, सीबीआय यांचा ससेमिरा लावला. अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपात दाखल झाले, हा कृतीचा परिणाम आहे. आता प्रश्न असा आहे की, कालपर्यंत जे तुम्हाला भ्रष्ट वाटत होते त्यांनी नेमके असे काय पुण्य केले ते अचानक तुम्हाला पुजनीय वाटू लागले? निर्लज्जपणाची देखील काहीतरी एक सीमा असते, अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजपवर बोचरा वार केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR