सोलापूर- सोलापूर शहरात अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. यासाठी अनेकदा वाहनधारकांना दोषी ठरवले जाते.
मात्र काही प्रमाणात समोरच्या व्यक्तीचा देखील या घटनेत दोष आढळून येतो. यामध्ये अक्कलकोट महामार्ग शांती चौक बोरामणी नाका चौक या रस्त्यांवर नेहमीच अशा घटना घडतात. असेच काहीसे दृश्य अक्कलकोट महामार्गवर दिसून येते.
सदरचा महामार्ग हा नागरिकांच्या चुकीमुळे मृत्यूचा सापळा आहे. या ठिकाणचे स्थानिक नागरिक रस्ता ओलांडण्यासाठी चक्क महामार्गावरून जीवघेणी कसरत करत आहेत. यामध्ये
महिला आबालृद्ध नागरिक यांना त्रास होत आहे.
महामार्गावरील दुभाजक ओलांडण्यासाठी तारेवरची कसरत करत आहेत मात्र ही कसरत मृत्यूला कारणीभूत ठरणारी आहे यावर प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या महिला आणि युवक दररोज सर्रासपणे अशाप्रकारे महामार्ग ओलांडत आहेत. एखादे भरधाव वेगात येणारे वाहन नागरिकांच्या मृत्यूलां कारणीभूत ठरत आहे. संबंधित नागरिक याकडे कानाडोळा करून रस्ता ओलांडून जात आहेत. दरम्यान अक्कलकोट रोड आणि शांती चौक हा नेहमीच अपघाताचा केंद्रबिंदू ठरला आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होऊन दुःखद घटना घडते