28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयअखेरच्या टप्प्यात शनिवारी ५७ जागांसाठी मतदान

अखेरच्या टप्प्यात शनिवारी ५७ जागांसाठी मतदान

मोदींसह दिग्गजांचे भवितव्य होणार मतदान यंत्रांत बंद
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान शनिवार, दि. १ जून रोजी होत आहे. ८ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील ५७ लोकसभा मतदारसंघात हे मतदान पार पडणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, पंजाब, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि चंदीगडमधील मतदारसंघांचा समावेश आहे. अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद होणार असून, दि. ४ जून रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार आहे.

२०१९ मध्ये भाजपने या ५७ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. तसेच टीएमसीने ८ तर काँग्रेसने ७ जागा जिंकल्या होत्या. सातव्या टप्प्यात एकूण ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण उमेदवारांपैकी ३२८ पंजाबमधील, १४४ उत्तर प्रदेश, १३४ बिहार, ६६ ओडिशा, ५२ झारखंड, ३७ हिमाचल प्रदेश आणि ४ चंदीगडमधील आहेत.

अखेरच्या टप्प्यात हाय होल्टेज लढती होत असून, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते अजय राय यांच्यात लढत होत आहे. पीएम मोदी २०१४ आणि २०१९ मध्ये वाराणसी मतदारसंघातून विजयी झाले आणि आता त्यांच्या तिस-या कार्यकाळाकडे लक्ष लागले आहे. यासोबतच हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात भाजपने अभिनेत्री कंगना रणावत यांना तर कॉंग्रेसने माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंग यांना उमेदवारी दिली आहे. यासोबतच इतर उमेदवारांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR