30.6 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeराष्ट्रीयहत्येच्या भीतीने स्वत: पत्नीचे लग्न प्रियकरासोबत करून दिले

हत्येच्या भीतीने स्वत: पत्नीचे लग्न प्रियकरासोबत करून दिले

मेरठ घटनेने पती घाबरला होता

लखनौ : उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमध्ये, एका पतीने आपल्या पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे. गावक-यांसमोर झालेला हा विवाह चर्चेचा विषय बनला आहे. या विवाहाबाबत आता पतीने खुलासा केला. मेरठच्या सौरभ हत्याकांडामुळे पती खूप घाबरला होता. सौरभप्रमाणे त्यानेही आपल्या पत्नीला तिच्या प्रियकराला भेटण्यापासून अनेक वेळा मनाई केली होती. यानंतरही ती ऐकत नव्हती.

पतीला सौरभ प्रमाणेच हत्या करतील याची भीती होती. त्याला त्याच्या हत्येचीही काळजी वाटत होती. या भीतीमुळे त्याने आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून देण्याचा निर्णय घेतला. संत कबीर नगरच्या धनघाटा पोलिस ठाणे परिसरातील कटार मिश्रा गावातील रहिवासी बबलूचा विवाह २०१७ मध्ये गोरखपूर येथील राधिकाशी झाला होता. काही वर्षे सर्व काही व्यवस्थित चालले. दोघांनाही दोन मुले होती.

दरम्यान, जेव्हा बबलू कामासाठी शहराबाहेर जाऊ लागला तेव्हा राधिका गावातील विशालच्या प्रेमात पडली. गेल्या दीड वर्षात दोघांमधील जवळीक इतकी वाढली की लोकांनी विशालला राधिकासोबत अनेक वेळा ये-जा करताना पाहिले. ज्यावेळी बबलूला या गोष्टीची माहिती मिळाली. तेव्हा त्याने राधिकाला विशालसोबतचे नाते तोडण्यास सांगितले. आपल्या दोन्ही मुलांचीही काळजी न करता, राधिकाने तिच्या पतीचे ऐकले नाही. ती तिच्या प्रियकराला भेटत राहिली.

दरम्यान, मेरठ आणि औरैयामध्ये दोन भयानक घटना उघडकीस आल्या. मेरठमध्ये पत्नी मुस्कानने तिच्या प्रियकरासह पती सौरभची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे केले. यानंतर, शरीर एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकण्यात आले आणि त्यावर सिमेंटचे द्रावण देखील ओतण्यात आले. त्याचप्रमाणे, औरैयामध्ये, लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांनी, प्रगती यादवने तिच्या प्रियकरासोबत राहण्यासाठी सुपारी देऊन तिच्या पतीची हत्या केली.

या दोन्ही घटनांमुळे पती बबलू खूप घाबरला. त्याने आपल्या पत्नीला सोडून सर्वांसमोर तिचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून देण्याचा निर्णय घेतला. बबलू राधिका आणि तिचा प्रियकर विशालसोबत घनघाटा तहसीलमध्ये पोहोचला. येथे एक करार पत्र तयार करण्यात आले. यानंतर, गावक-यांच्या उपस्थितीत शिव मंदिरात दोघांचेही लग्न झाले. मुलांना स्वत:कडे ठेवण्याची आणि त्यांना वाढवण्याची जबाबदारीही त्याने घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR