33 C
Latur
Monday, June 2, 2025
Homeमहाराष्ट्रअकरावी प्रवेश प्रक्रिया संथ गतीने

अकरावी प्रवेश प्रक्रिया संथ गतीने

तांत्रिक अडचणींमुळे अर्ज नोंदणी निम्म्यावर!

मुंबई : प्रतिनिधी
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळविल्यानंतरही इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक दिवसांनंतरही सुरू असलेल्या या तांत्रिक घोळामुळे अकरावी प्रवेशासाठीची विद्यार्थ्यांची अर्ज नोंदणीची संख्या आता निम्म्यावर आली आहे.

दरम्यान, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळविल्यानंतरही इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक दिवसांनंतरही सुरू असलेल्या या तांत्रिक घोळामुळे अकरावी प्रवेशासाठीची विद्यार्थ्यांची अर्ज नोंदणीची संख्या आता निम्म्यावर आली आहे. अर्ज नोंदणीला सुरुवात झाल्यानंतर दिवसभरात जवळपास दोन ते अडीच लाखांच्या संख्येने होणारी विद्यार्थ्यांची अर्ज नोंदणीची संख्या ही आता केवळ दीड लाखांच्या घरात आहे. अकरावीचे अद्यापही लाखो विद्यार्थी अर्ज नोंदणी प्रक्रियेपासून वंचित असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांच्या संतापाचा पारा दिवसेंदिवस आणखी चढत आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज नोंदणी प्रक्रियेला सोमवार, २६ मेपासून ऑनलाईन पद्धतीने सुरुवात झाली. मात्र पहिल्या दिवशी संकेतस्थळावर २,५८,८८७ इतकी नोंदणी झाली. तर जेमतेम २ लाख २६ हजार विद्यार्थ्यांना अर्ज दोन भरण्यात यश आल्याची आकडेवारी आहे. म्हणजेच साडेचार लाख विद्यार्थी प्रक्रियेत अडकले आहेत.

अर्ज नोंदणी करताना संकेतस्थळ हँग होण्यासह पसंतीक्रम शोधताना जाणारा वेळ, शुल्क भरण्यात येणा-या अडचणी, अशा अनेक तक्रारींमुळे पालक व विद्यार्थी वैतागले आहेत. सुधारण्यासाठी हे संकेतस्थळ चार दिवस बंद ठेवूनही काहीच दर्जात्मक फरक पडला नसल्याने संपूर्ण प्रणालीच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR