उसाला तुरा आल्याने वजनात घट

सोलापूर : यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील साखर कारखाने उशिरा सुरू झाले आहेत. त्यातच उसाला तुरा आल्याने त्याच्या सरासरी वजनात घट होण्याची शेतकऱ्यांना भीती वाटत आहे. ऊस उत्पादक शेतकरी तुरा आलेल्या उसाची तोड कारखान्याकडून वेळेत व्हावी, अशी मागणी करत आहे.

सध्या बारा महिन्यांचा काळ उलटलेल्या उसाला तुरा आला आहे. तुरा आल्याने उसामध्ये पोकळी तयार होत असते. यामुळे वजनात घट होण्याची भीती आहे. लवकर ऊस कारखान्याला पाठवण्यासाठी शेतकरी अटापिटा करताना दिसत आहेत. कारण वजन कमी झाले की, सरासरी उताराही कमी पडतो.

अशी शंका शेतकरी व्यक्त करत आहेत. ऊस अडवा तिडवा पडल्याने पुन्हा त्याला फुटवा फुटतो. म्हणून ऊस उत्पादक शेतकरी ऊस दराच्या आंदोलनापेक्षा वावरातील ऊस कारखान्याला घालण्यासाठी विविध कारखान्याच्या चिटबॉयकडे चौकशी करण्यात व्यस्त आहेत. उशीर झाला की पुन्हा तुरा वाढण्याची भिती आहे. आता दिवसेंदिवस उन वाढण्याची सुद्धा चिंता सतावत आहे.

अनेक साखर कारखान्याकडे टोळ्या कमी आहेत. साखर कारखान्यांकडे व ऊस वहातूक मालकांकडे हॉर्वेस्टर मशिन वाढल्या आहेत. जिथे मशीनने ऊसतोडीला अडचण आहे, अशा ठिकाणी व आडवा तिडवा पडलेल्या उसाची तोड करण्यासाठी टोळीच लागते. टोळ्यांची संख्या कमी आहे. जिथे काळी माती आणि भुसभुशीत जमीन आहे, अशा जमिनीतही मशीन चालत नाही, तेथेही टोळीच लागते. कारण येथे मशीन जमिनीत रूतण्याची भीती असते.

त्यामुळे उसाची वेळेवर तोड होण्यात अडचणी येत आहेत. कारखान्याकडून ऊसतोड कार्यक्रमानुसार तोड सुरू असते; पण या वर्षी ज्याच्या उसाला तुरा आली अशा उसाच्या तोडीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

कारखान्याने शेतकऱ्याचे हित पहावे. हंगाम उशिरा सुरू झाल्याने तोडीलाही उशीर होत आहे. यामुळे उसाला तुरा आला आहे. कारखान्याने तुरा आलेला ऊस तोडण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होईल.अशी मागणी ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Jalkot|घागरदऱ्यात हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी हजारोंची गर्दी
01:40
Video thumbnail
BREAKING : लातूरकरांनो सावधान! मांजरा धरणाची पाणीपातळी चिंताजनक!
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार! गांधी चौकात होणार महाआंदोलन
04:20
Video thumbnail
Nanded|पाऊस नाही, पिके करपली! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
01:44
Video thumbnail
Nanded|हातात लग्नाचा बॅनर घेऊन तरुण टॉवरवर! कौटुंबिक त्रासाचा आरोप | लोह्यात खळबळ
00:46
Video thumbnail
Nanded|गणरायाचं विसर्जन करायचं कुठे? नांदेडमध्ये नदी-खदानी कोरड्या | महापालिकेसमोर संकट
02:26
Video thumbnail
Latur|खरगे यांच्या अवमानाविरोधात पुरोगामी संघटना एकवटल्या! गांधी चौकात निषेध सभा
03:14
Video thumbnail
Latur|जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुण टॉवरवर! रेणापूरच्या कोरेगावातील आंदोलन
02:04
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55

Latest news