22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरकौशल्यपुर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना जागतीक व्यासपीठ उपलब्ध होणार

कौशल्यपुर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना जागतीक व्यासपीठ उपलब्ध होणार

 

सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन देशातील विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. कौशल्यपूर्ण शिक्षणामुळे भारतातील विद्यार्थ्यांना जगातील विविध देशामध्ये नोकरीसाठी संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात रुसा निधी अंतर्गत साकारण्यात आलेल्या वस्तीगृहाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, उद्योजिका चंद्रिका चव्हाण उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जुन २०२४ पासुन महाराष्ट्रातील मुलींना सर्व शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी होस्टेल मिळणार नाही. अशा विद्यार्थ्यांना दर महा पाच हजार तीनशे रुपये देण्यात येतील तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला शिक्षण, प्रवास, रहाणे आणि भोजन मोफत देणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, नविन शैक्षणीक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला एका पदवी बरोबर दुसर्‍या विद्यापीठाची अथवा इतर देशातील विद्यापीठाची पदवी घेता येणार आहे. त्याच बरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला बहुभाषीक होणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR