सोलापूर : शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत बाजू देण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील जवळपास १ हजार लामाध्यर्थ्यांना ४५ हजार ब्रास बाजू देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून आखण्यात आले असून, यासाठी जिल्ह्यातील ११४ ठिकाणी बाजू वाटप स्थळे निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिली.
जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाटू देण्यासाठी महाखनीज पोर्टलवर नोंदी घेण्यात येत आहेत. आतापर्यंत ६९८ लाभार्थ्यांची यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली असून, सर्व तहसील पातळीवरून त्यांना वाळू वाटप करण्यात येणार आहे. पासाठी बायहॅन्ड त्यांना परमोट दिली जाणार आहेत. ही परमीट१ महिन्याच्या आत घेवून संबंधित गटावर गेल्यावर त्यांना वालू मिळणार आहे. याशिवाय बेकायदा उपसा व वाहतूक प्रकरणात जप्त केलेली १७० ब्रास वाळूही १८३ लाभाथ्यांना वाटप करण्यात आली आहे. तर उर्वरित लाभाथ्यांना २ ते ३ आठवडपात प्रत्येकी ५ ब्रास वाळू देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांना शासकीय जागाही देण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील पंचायत समितीकडून २ हजार ६६ लाभाच्यांना जागा देण्याचे प्रस्ताव प्राप्त आहेत. यात १ हजार २३५ लाभाभ्याँचे प्रस्ताव परिपूर्ण आहेत. यातील २५२ लाभाष्यांना जागाही देण्यात आली असून, उर्वरीत लाभाध्यांना महिनाभरात जाना घरकुलासाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचीही माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करांवर कडक कारवाई करण्याची मोहिम घेण्यात आली आहे. वाळू तस्करावर आता केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांच्याविरुद फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पंढरपूरचे तहसीलदार यांनी २ वाळू तस्करांना सबजेलमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सब वेलची कारवाई झाल्यानंतर जामिनासाठी एक लाख रुपये बॉण्ड आणि दोन सरकारी अधिकारी, कर्मचारी जामीनदार द्यावे लागणार आहे. वाळू चोरी करणान्यांना अशी कठोर शिक्षा आपल्याकडेच देण्यात येत आहे. दरम्यान, आता जिल्ह्यातील वाळू, मुरुम, दगड आदींचे अवैध उत्खनन केले तर त्या केसमध्ये आता दंडात्मक कारवाई नाहीतर थेट एफआयआर फाडण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिला आहे.