छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर विवाहित महिलेने गंभीर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देत म्हटले, दुर्दैव याचे वाटते की, एका मंत्र्याच्या मुलाने तिसरे लग्न केले आणि ज्या मुलीशी लग्न केले त्या मुलीला आता धमकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे. मग
दरम्यान, कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांतवर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. सिद्धांतने फसवणूक करून, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करत महिलेच्या वकिलांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांतवर आरोप करणा-या महिलेचे नाव जान्हवी सिद्धांत शिरसाट असे आहे. तिचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दावा केला आहे की जान्हवीला नांदवायला त्यांनी नकार दिला. तिने छत्रपती संभाजीनगरला येण्याचा आग्रह केला, पण तिला येऊ दिले नाही. तिला मुंबईत रहायला सांगितले. आता प्रकरणावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देत महिला आयोगाला देखील सवाल केला आहे.
एका मंत्र्याच्या मुलाने तिसरे लग्न केले आणि ज्या मुलीशी लग्न केले त्या मुलीला आता धमकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे. मग सगळे लोक गप्प का बसले आहेत? आम्ही असे केले असते तर अख्खा मीडिया घरासमोर जमला असता. महिला आयोगाला आम्ही विनंती करणार आहे की, तुम्ही आताही गप्प बसणार आहात का? रुपाली चाकणकर ताईंना आम्ही हात जोडून विनंती करत आहोत की, ताई ती मुलगी मुंबईमध्येच राहते. तिला जाऊन भेटा आणि तिला न्याय मिळवून द्या.