33 C
Latur
Sunday, April 27, 2025
Homeलातूर‘निरी’च्या सूचनांचा अंमल, पिवळे पाणी झाले शुद्ध 

‘निरी’च्या सूचनांचा अंमल, पिवळे पाणी झाले शुद्ध 

लातूर : प्रतिनिधी
लातूर, धाराशिव व बीड या तीन जिल्ह्यांतील सुमारे २१ पाणीपुरवठा योजनांना केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणातून पाणी पुरवठा होतो. या धरणातून पाणीपुरवठा होणा-या सर्वच ठिकाणी पिवळ्या पाण्याची समस्या जाणवत आहे. लातूर शहर महानगरपालिकेने निरी या संस्थेने सूचवलेल्या उपाययोजना अंमलात आणल्या असून सद्यस्थितीत शहरात नळाला येणारे पाणी शुद्ध आहे. या पाण्याची जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून दैनंदिन तपासणी केली जात आहे. नळाला येणारे पाणी पिण्यासाठी योग्य असून त्यामुळे आरोग्याला काहींही धोका नाही.
लातूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचे शुद्धकरण करुन नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो. जलशुद्धकरण केंद्रातील पाणी स्थिर व्हावे, यासाठी सध्या शहराला चार दिवसांऐवजी सात दिवसांना पाणी पुरवठा केला जात आहे. मांजरा धरणावरुन हरंगुळ जलशुद्धकरीण केंद्र येथे केला जाणारा पाणीपुवठा सध्या जॅकवेलच्या खालच्या गेटमधून केला जात आहे. शेवाळ मिश्रित व इतर जैविक मटेरियलमुळे पाणी पिवळसर होऊन ते जलशुद्धीकरण केंद्र येथे येत आहे. जॅकवेलचे खालचे गेट बंद करुन वरील बाजूच्या गेटमधून पाणीपुरवठा करण्याची उपाययोजना महानगरपालिकेच्या वतीने केली जात आहे.
हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात आलेले पाणी स्थिर व्हावे, यासाठी सध्या शहरात चार दिवसांऐवजी सात दिवसांना पाणीपुरवठा केला जात आहे. महानगरपालिकेच्या वतीने हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात ब्लिचिंग पावडर, तुरटी, क्लोरीन गॅस, तसेच पीएसी पावडरचा वापर करुन पाणी शुद्धकेले जाते. पाण्याचा पिवळसरपणा कमी केला जातो. हेच पाणी शहराला पुरवठा केले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR