लातूर : प्रतिनिधी
जिल्हा वार्षिक नियोजनातील सन २०२२-२३ मधील प्राप्त निधी जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाने १०० टक्के खर्च केला असून परीक्षा शुल्क व सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ३३ लाख ५ हजार ६२५ रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी यांनी वेळोवेळी बैठका घेवून हा निधी पात्र विद्याथ्र्यांना मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत.
पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षताही घेण्यात आलेली आहे. यासह तालूकास्तरावरही शिबीरांचे आयोजन करुन प्रस्तावांचे संकलन करण्यात आले आहे. या योजनेचे उद्दिष्ट मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करणे, गुणवंत विद्यार्थींनीना प्रोत्साहन देणे तथा गरजू विद्यार्थींनीना लेखन तसेच शैक्षणिक साहित्य खरेदी करणे शक्य व्हावे अशी आहेत.