25.4 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeबनावट सुप्रीम कोर्टात सुनावणी; उद्योजकाला सात कोटींचा गंडा

बनावट सुप्रीम कोर्टात सुनावणी; उद्योजकाला सात कोटींचा गंडा

उलाढाल । अमेरिकेचे दररोज ५ अब्ज डॉलर्स नुकसान, जगभरातील सामान्यांच्या खिशाला फटका बसण्याची चिन्हे

 

लुधियाना : वृत्तसंस्था
सायबर भामटे कोणत्या थराला जातील, याची कल्पनाही करता येणार नाही. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाने बनावट सुनावणी करून अटकेची भीती दाखवून वर्धमान समूहाचे अध्यक्ष एस.पी. ओसवाल (८२) यांना तब्बल ७ कोटी रुपयांचा गंडा घातला गेला. या प्रकरणी सायबर पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीची ओळख पटविली असून, दोन जणांना गुवाहाटी येथून अटक केली. आरोपींकडून सुमारे ६ कोटी रुपये परत मिळविण्यात यश आले आहे.

एस.पी. ओसवाल यांना २०१० मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सायबर भामट्यांनी काही उद्योगपतींना अडकविण्यासाठी जाळे विणले होते. ओसवाल यांनी लुधियाना पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार केली. त्यानंतर, पोलिसांनी बँक खात्यांचा तपास करून या टोळीचा म्होरक्या अतनू चौधरी आणि आनंद चौधरी यांना गुवाहाटी येथून अटक केली.

एका भामट्याने मोबाइलवर कॉल करून आपण दिल्लीतून बोलत असल्याचे सांगितले. सर्वाेच्च न्यायालयाने त्यांच्या नावे अटक वॉरंट जारी केला आहे, तसेच मालमत्ता जप्तीची भीती दाखविली. ईडी, सीबीआय, तसेच कस्टम विभागाचाही दाखला त्यांना देण्यात आला.

दुस-या दिवशी ऑनलाईन सुनावणी सुरू झाली. सर्वाेच्च न्यायालयाचा बनाव रचण्यात आला. न्यायाधीश दिसत नव्हते. मात्र, त्यांचा आवाज येत होता. त्यांनी थेट ओसवाल यांची संपत्ती हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले, अन्यथा अटक करा, असे सांगितले. अटक वॉरंटही पाठविला. ओसवाल यांनी वाटाघाटी सुरू केल्या आणि तिथेच ते फसले. वेगवेगळ्या कायद्यांचा धाक दाखवून ओसवाल यांच्याकडून कोट्यवधी रुपये वसूल केले.

बॅँक कर्मचारी सामील?
दोघांच्या बँक खात्यात ७ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. त्यापैकी ४ कोटी रुपये अतनू याच्या, तर ३ कोटी रुपये आनंद याच्या खात्यात जमा झाले होते. या प्रकरणात आसाममधील बँकेचे कर्मचारीही सामील असण्याचा संशय पोलिसांना आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR