भटक्या श्वानांची आता होणार मोजदाद 

लातूर : प्रतिनिधी
भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायतींनी निर्बिजीकरण हा एकमेव पर्याय खुला ठेवला पाहिजे. सध्या सुरु असलेल्या पशु गणनेत भटक्या श्वानांचीदेखील मोजदाद होणार आहे. हल्ली भटक्या श्वानांची संख्या भरमसाठ वाढली असून त्यांच्यात खरुजसारखी साथ पसरली आहे. हे मानवी आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहराच्या गल्लीबोळात, गावांत शेकडोनिशी भटक्या श्वानांची संख्या आहे. सर्व श्वानांचे निर्बिजीकरण करणे शक्य आहे का? हा देखील प्रश्न आहे. भटक्या श्वानांमुळे सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. यावर पशुसंवर्धन विभागाने रामबाण पर्याय शोधला पाहिजे. यासंदर्भात पशुसंवर्धन विभाग हात वर करीत असून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायतीसारख्या संस्थांनीच यावर निर्बिजीकरण हा एकमेव पर्याय निवडावा, असे सांगीतले जात आहे. वास्तविक छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे निर्बिजीकरण करण्यासारखी यंत्रणा नसते. त्यामुळे मोठ अडचण होते. पुर्वी भटक्या श्वानांचा विषारी द्रव्य देऊन मारले जायचे. आता तसे करता येत नाही.
प्राणिमित्र व अन्य संघटना, संस्था या विरोधात आवाज उठवतात. परिणामी भटक्या श्वानांची संख्या वाढत जाते. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो. भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करणे एवढे सोपे नाही आणि सहज होणारे काम नाही. लहान नगरपंचायती, ग्रामपंचायतींकडे तशी यंत्रणा नसते. यंत्रणा असली तरी कोणी या कामात लक्ष घातल नाही,. हे लातूर महानगरपालिकेच्या कामावरुन अनेकवेळा दिसून आले आहे. शहरताील अनेक भागात भटक्या श्वानांचे टोळके पाहूण सामन्यांचा थरकाप उडतो. या भटक्या श्वानांनी अप्रिय कारनामेदेखील केले आहेत. त्याचा मानवी जीनजीवनावर परिणाम झाल्याचे पाहण्यात येते, असे असतानाही या भटक्या श्वानांचा बंदोबस्त केला जात नाही. ती करण्याची गरज आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|लातूरमध्ये दुष्काळाची छाया; सोयाबीन पिकाची पाहणी करत माजी आमदार धीरज देशमुख आक्रमक
03:57
Video thumbnail
Latur|सलगऱ्यात ९२ फुटी भव्य अस्थी विसर्जन घाट! देविदास गुरधाळे मामा यांच्या स्मरणार्थ मोठा प्रकल्प
04:51
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:07
Video thumbnail
Jalkot|घागरदऱ्यात हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी हजारोंची गर्दी
01:40
Video thumbnail
BREAKING : लातूरकरांनो सावधान! मांजरा धरणाची पाणीपातळी चिंताजनक!
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार! गांधी चौकात होणार महाआंदोलन
04:20
Video thumbnail
Nanded|पाऊस नाही, पिके करपली! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
01:44
Video thumbnail
Nanded|हातात लग्नाचा बॅनर घेऊन तरुण टॉवरवर! कौटुंबिक त्रासाचा आरोप | लोह्यात खळबळ
00:46
Video thumbnail
Nanded|गणरायाचं विसर्जन करायचं कुठे? नांदेडमध्ये नदी-खदानी कोरड्या | महापालिकेसमोर संकट
02:26
Video thumbnail
Latur|खरगे यांच्या अवमानाविरोधात पुरोगामी संघटना एकवटल्या! गांधी चौकात निषेध सभा
03:14
Video thumbnail
Latur|जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुण टॉवरवर! रेणापूरच्या कोरेगावातील आंदोलन
02:04
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13

Latest news