26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रातील शेतक-यांवर ८,३८,२४९ कोटींचा बोजा!

महाराष्ट्रातील शेतक-यांवर ८,३८,२४९ कोटींचा बोजा!

जड झाले ओझे । १० वर्षांत १,१२,००० शेतक-यांची आत्महत्या; ‘एनसीआरबी’चा दोन वर्षाचा अहवाल प्रलंबित

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबत नसतानाच देशभरातील शेतक-यांवर १२ लाख १९ हजार ५१६ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. महाराष्ट्रातील शेतक-यांवर सर्वाधिक म्हणजे ८,३८,२४९ कोटींचे कर्ज थकीत असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली होती, ती पुन्हा चर्चेत आली आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, मागील १० वर्षांत तब्बल १,१२,००० शेतक-यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला असल्याचे दिसून आले.

२०१५ मध्ये १२ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर २०१९ पासून २०२२ पर्यंत आत्महत्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. एनसीआरबीचा २०२३ आणि २०२४ चा अहवाल अद्याप प्रकाशित झालेला नाही, हे येथे उल्लेखनीय आहे.

कोणत्या बँकेचे किती कर्ज : कमर्शियल बँकेचे ६,३४,२१६ कोटी, सहकारी बँकांचे २,६५,४१९ कोटी आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे ३,१९,८८१ कोटी असे १२ लाख १९ हजार ५१६ कोटी रुपयांचे कर्ज शेतक-यांवर थकीत आहे. मात्र, शेतक-यांचे कर्ज माफ करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रातील शेतक-यावर
कोणत्या बँकेचे किती कर्ज?
महाराष्ट्रातील शेतकरी देशात सर्वांत जास्त कर्जबाजारी आहे. येथील शेतक-यांवर कमर्शियल बँकेचे ७,९३,७८९ कोटी, सहकारी बँकेचे ३५,४५६ कोटी आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे ९००४ कोटी असे ८,३८,२४९ कोटींचे कर्ज डोक्यावर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR