लातूर : प्रतिनिधी
परिवाराची खंबीर साथ मिळाली की कितीही बिकट परिस्थितीवर विजय मिळवणे शक्य होत असते. यशाचे अत्युच्च शिखर गाठण्यासाठी जीवनात मानसिक, आर्थिक, पारिवारिक संतुलन असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हैदराबादच्या ख्यातनाम उद्योजिका भगवती बलदवा यांनी केले. लातुरात महेश नवमीचे औचित्य साधून दयानंद सभागृहात गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या महेश शौर्य, महेश महेश गौरव , महेश भूषण पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी मंचावर लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष सीए प्रकाश कासट, सचिव फुलचंद काबरा, अ. भा. महासभा सदस्य हुकूमचंद कलंत्री, बालकिशन मुंदडा, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटनच्या प्रदेश उपाध्यक्षा अनिता मालू, राम भुतडा, राजेशकुमार मंत्री, जगदीश भुतडा, विजयकुमार चांडक, मंगल लड्डा, अभिषेक मुंदडा, अॅड. नंदकिशोर लोया, ईश्वर बाहेती, संतोष तोष्णीवाल, गणेश हेड्डा, चंदूशेठ लड्डा, राहुल लोया आदी मान्यवरांची उपस्थिती होती. भगवती बलदवा आणि मान्यवरांच्या हस्ते यावेळी संतोष तोष्णीवाल यांना महेश शौर्य, बालकिशन पांडुरंग मुंदडा यांना महेश भूषण, लक्ष्मीकांत मोतीलाल सोमाणी, लातूर, शामसुंदर बालकिशन मानधना, लातूर, श्रीनिवास मदनलाल सोनी, उदगीर, जुगलकिशोर रामनारायण गिल्डा, लातूर यांना महेश गौरव तर रामविलास जगन्नाथ सोनी, अहमदपूर, यतिराज मोहनलाल झंवर, औराद, डॉ. लीला श्रीकांत कर्वा लातूर यांना महेश सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष सीए प्रकाश कासट यांनी केले. हुकूमचंद कलंत्री यांनी कार्यक्रमाची रूपरेषा कथन केली. महेश नवमीचे औचित्य साधून सहकार्य केल्याबद्दल मालू परिवार, प्रमोद मुंदडा, अमर बियाणी, लक्ष्मीरमण लाहोटी, जान्हवी बाहेती, कृष्णा बजाज, आदींचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा माहेश्वरी, लातूर, लातूर जिल्हा माहेश्वरी युवा संगठन, माहेश्वरी किशोरी मंडल यांसह माहेश्वरी सभेच्या सर्व पदाधिका-यांनी परिश्रम
घेतले.