लातूर : प्रतिनिधी
निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची मोठी गर्दी झाली. कर्मचारी जागेवर नसल्याने आणि वीज पुरवठा खंडित झाल्याने निराधारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेणापूर नगर पंचायत येथील दि. ३० ते रोजीची ही स्थिती. कार्यतत्पर लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी तत्काळ या घटनेची दखल घेतली. त्यांच्या सुचनेनुसार रेणापूर नगर पंचायत या ठिकाणी सचिन मोटेगावकर, पाशाभाई शेख, कोंडीराम काळे, सचिन इगे, प्रदीप काळे, अमित पाटील तातडीने पोहचले आणि निराधारांच्या पगारी झाल्या.
रेणापूर नगर पंचायत येथे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच तहसीलचे कर्मचारी हजर नव्हते. हे चित्र त्यांना पहायला मिळाले. थोड्याच वेळात कोंडीराम काळे यांनी तहसील कर्मचा-यांना बोलावून घेतले. संगणक वीजपुरवठा उपलब्ध नसल्याने तात्काळ नगर पंचायतचे दहीफळे, विशाल इगे, नवनाथ पांचाळ यांना त्याची व्यवस्था करून देण्यास सांगितले. त्यामुळे केवायसी करण्यास सुरुवात झाली. तसेच पैसे कोणत्या बँकेत जमा झाले, याची माहिती देण्यास सुरुवात झाली.
यावेळी पत्रकार रफीकभाई शिकलकर, पत्रकार बालाजी कटके हेही उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी गैरसोय अवघ्या तासाभरात सोडवल्याबद्दल माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.