यश येणार नसल्याची खात्री झाल्याने हिंदू-मुस्लिमचे राजकारण

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नेत्यांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. त्यातच यंदाच्या निवडणुकीत ‘व्होट जिहाद’ होत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला गेला आहे. त्यांच्या या आरोपांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. भाष्य करताना शरद पवारांनी फडणवीसांना सुनावले आहे.

शरद पवारांनी फडणवीसांवर बोलताना, ‘जिहाद’ हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी काढला. काही मतदारसंघांत मायनॉरिटीने महाविकास आघाडीने मतदान केले. पुण्याच्या काही भागात विशिष्ट समाज आहे. हिंदू समाज आहे. त्यांनी भाजपला मतदान केले तर आम्हाला सवय आहे. असेच होते. पण याचा अर्थ जिहाद होतो असे नाही. फडणवीस यांनी जिहाद शब्द वापरला. फडणवीस आणि त्यांच्या सहका-यांनी या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. हिंदू आणि मुस्लिमांमधील वातावरण ते खराब करत आहेत, असे शरद पवार म्हणाले.
पुढे बोलताना शरद पवारांनी ‘मी अनेक पंतप्रधानांची भाषणं ऐकली.

निवडणुकीच्या काळात. मी कॉलेजात शिकत असताना नेहरूंचे भाषण पुण्यात ऐकले. त्यानंतर सर्व पंतप्रधानांची भाषणे ऐकली. साधारण उद्याचा विकास कसा असेल. काय कार्यक्रम असेल हे मांडतात. पहिले पंतप्रधान मोदी आहेत त्यांनी सुरुवातच केली ‘४०० पार’ची. ‘४०० पार’ कशासाठी?,अशा शब्दांत टीका केली.
तसेच नरसिंह राव पंतप्रधान होते. आमची मेजॉरिटी नव्हती. त्यांना बहुमत नव्हते. तरीही सरकार चालवले. सरकार चालते. तरीही मोदी ‘४०० पार’ मागत होते. याचा अर्थ त्यांचे सहकारी घटनाबदलाचे बोलत होते. संविधानात दुरुस्तीबद्दल बोलत होते. त्यामुळे आम्हाला लोकांना सांगावे लागले की सरकार काय करणार आहे. आपल्याला भूमिका घ्यायला पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.

निकालानंतर बघू किती जागा येतील
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळतेय. अशातच कोणत्या आघाडीला आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याबाबत तर्क लावले जात आहेत. याचबाबत शरद पवारांना विचारण्यात आले. तेव्हा मी काही ज्योतिषी नाही. निकालानंतर बघू किती जागा येतील, असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल का? यावरही मी काही ज्योतिषी नाही, असे पवार म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|MPSC ऑनलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार
00:30
Video thumbnail
Ramdas Athawale ON Sharad Pawar|शरद पवारांनी NDA मध्ये यावे, स्वागतच करू" – आठवले
11:50
Video thumbnail
Latur|द्रोणा डिफेन्स अकॅडमीविरोधात मनसेचे आंदोलन
03:19
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32
Video thumbnail
Nanded|महिलांची ताकद! वझरा गावात दारूबंदीचा ठराव मंजूर
00:25
Video thumbnail
Nanded|₹1.30 कोटींचा बंधारा... पण लाथ मारताच कोसळला?
02:50
Video thumbnail
Latur|सावकाराने जमीन हडपल्याचा आरोप; शेतकऱ्याचे आमरण उपोषण
04:42
Video thumbnail
Latur|गटप्रवर्तक महिलांचे आशाताई भिसे यांना साकडे
06:36
Video thumbnail
Breaking News|लातुरातील नामांकित डॉक्टरची आत्महत्या! घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
01:59
Video thumbnail
Big Breaking|धक्कादायक! लातूरचे नामांकित डॉक्टर मेहुल राठोड यांची आत्महत्या
00:30
Video thumbnail
Latur|ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात? आशाताई भिसे आक्रमक
04:17
Video thumbnail
Latur|अंजली नगरातील आगग्रस्त घराची आमदार अमित देशमुख यांनी केली पाहणी
04:41
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16

Latest news