28.7 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रसत्ता कुणाचीही येऊ दे, आठवलेंची जागा पक्की

सत्ता कुणाचीही येऊ दे, आठवलेंची जागा पक्की

नागपूर : प्रतिनिधी
केंद्रात चौथ्यांदा आमचे सरकार येईल, असे आठवले यांनी म्हटले आहे. आमची सत्ता येईल की नाही माहिती नाही; पण सत्ता कुणाचीही आली तरी आठवले यांची जागा पक्की आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

मारवाडी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा २०२४ चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार रविवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत येण्याचे तंत्र माहिती असल्याने आम्ही चौथ्यांदा सरकार बनवू, केवळ आपला समाज नाही तर सगळा समाज, देश जोडला पाहिजे, ही बाबासाहेबांची भावना होती व त्यानुसारच मी काम करीत असल्याचे ते म्हणाले.

एकत्रीकरण करण्याच्या नावाने रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आजही एकत्र येण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR