नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निकालादरम्यान यावेळी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातही उत्साहाचे वातावरण आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नेते काँग्रेस कार्यालयात उपस्थित आहेत.
२००९ नंतर प्रथमच निवडणूक निकालामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. सध्या एनडीए २७३ जागांवर तर इंडिया अलायन्स २५१ जागांवर आघाडीवर आहे. इतरांना २१ जागांचे नुकसान होताना दिसत आहे. राहुल गांधी त्यांच्या दोन्ही जागांवर आघाडीवर आहेत. तर अमेठीमध्ये काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा पुढे आहेत. यामुळे स्मृती इराणी यांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.