24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeअतिवृष्टीमुळे १,१८२ शेतक-यांची आत्महत्या

अतिवृष्टीमुळे १,१८२ शेतक-यांची आत्महत्या

बेळगाव : वृत्तसंस्था
दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे १ एप्रिल २०२३ ते ४ जुलै २०२४ दरम्यान १ हजार १८२ शेतक-यांनी आत्महत्या केली. यात बेळगाव जिल्ह्यामधील १२२ शेतक-यांचा समावेश आहे. एकीकडे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आणि एनसीआरबीकडे दाखल आत्महत्या प्रकरणांत कर्नाटक राज्य देशात पाचव्या स्थानी आहे.

महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालनंतर कर्नाटक देशामध्ये ५ व्या स्थानावर आहे. सुमारे १३ हजारांपेक्षा अधिक जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यामध्ये सुमारे १२०० अन्­नदात्यांचा समावेश आहे.

बेळगाव जिल्ह्यात चालू वर्षात १२२ शेतक-यांनी आत्महत्या केली. हावेरीत १२० आणि धारवाडमध्ये १०१ शेतक-यांनी आत्महत्या केली. महसूल विभागाकडून शेतकरी आत्महत्येच्या नोंदी गेल्या दीड वर्षामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्यात ही आकडेवारी पुढे आलेली आहे. एकीकडे कर्नाटकात २०२२-२३ मध्ये वेगवेगळ्या कारणांनी १३,०५६ जणांनी आत्महत्या केली. देशात एकूण आत्महत्यात कर्नाटकात ८ टक्के आत्महत्या झाल्याची नोंद आहे.

भारतात २०२० च्या तुलनेत ७.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आत्महत्यांचे प्रमाण ६.२ टक्क्यांनी वाढले आहे. सदर अहवालानुसार सर्वाधिक २२,२०७ आत्महत्या महाराष्ट्रामध्ये झाल्या आहेत. तामिळनाडूत १८,९२५ आत्महत्या, मध्य प्रदेशात १४,९६५ आणि पश्चिम बंगालमध्ये १३,५०० आत्महत्या झाल्या. देशातील ५०.४ टक्के आत्महत्या कर्नाटकासह पहिल्या पाच राज्यांमध्ये झाल्या.

उर्वरित ४९.६ टक्के प्रकरणे २३ इतर राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमधून नोंदवली गेली आहेत. एकीकडे शेतकरी पीकहानी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे जीवन संपवित आहे. दुसरीकडे सामान्यवर्ग व्यावसायिक समस्या, अत्याचार, मानसिक विकार, कौटुंबिक समस्या, एकटेपणाची भावना, हिंसाचार, विविध प्रकाराची व्यसने, दीर्घकालीन वेदना व आर्थिक संकटाने मेटाकुटीला येऊन आत्महत्या करीत असल्याची नोंद आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR