22.9 C
Latur
Thursday, October 2, 2025
Homeमहाराष्ट्रअबू आझमींच्या वक्तव्याने नवा वाद

अबू आझमींच्या वक्तव्याने नवा वाद

राज ठाकरेंची मनसे सेना आक्रमक

मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वादात समाजवादी पक्षाचे (सपा) प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. भिवंडीत मराठी बोलण्याची गरज आहे का असा प्रश्न आझमी यांनी उपस्थित केला. त्यांनी विचारले, ‘मराठी आणि हिंदीमध्ये काय फरक आहे?’ या टिप्पणीमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे.

मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडीला भेट देताना अबू आझमी यांनी नवा वाद निर्माण केला. कल्याण रोडचे रुंदीकरण थांबवण्याची मागणी ते करत होते, म्हणूनच त्यांनी भेट दिली. या भागात मुस्लिम लोकसंख्या मोठी आहे आणि त्यावेळी मराठी बोलण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

अबू आझमी माध्यमांना संबोधित करत असताना, मराठी पत्रकारांनी त्यांना मराठीत उत्तर देण्याचा आग्रह केला. सपा नेते म्हणाले, ‘मराठी आणि हिंदीमध्ये काय फरक आहे? मी मराठी बोलू शकतो, पण भिवंडीत मराठीची काय गरज आहे?’ दिल्ली किंवा उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी ‘मराठी विधाने’ समजली जाणार नाहीत असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावरून आता राज ठाकरेंची मनसे आक्रमक झाली असून त्यांनी आपण आता आमच्याच भाषेत बोलून दाखवू असा इशारा दिला आहे.

राज ठाकरेंची मनसे त्यांच्याच भाषेत बोलेल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) ठाणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष परेश चौधरी यांनी या टिप्पणीवर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, ‘‘अबू आझमी, तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात आहात. जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात आहात, तेव्हा तुम्हाला उत्तर प्रदेशातील लोकांची काळजी का वाटते? भिवंडी महाराष्ट्रात आहे. येथे फक्त मराठी भाषा स्वीकारली जाईल. जर तुम्हाला मराठी बोलण्यास लाज वाटत असेल, तर आम्ही तुम्हाला मनसे शैलीत उत्तर देऊ.’’

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR