30.5 C
Latur
Saturday, May 31, 2025
Homeलातूरआता प्र्रतिक्षा अनुदानाची

आता प्र्रतिक्षा अनुदानाची

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात मंगळवार दि. २७ मे रोजी लातूर शहर व परिसरात अतिवृष्टी झाली. अचानक झालेल्या अतिवृष्टीने लातूर शहरात अवघ्या दोन तासांतच हाहाकार उडाला. या पावसामुळे शहराच्या विविध भागांतील सुमारे ४०० नागरिकांच्या घरात पाणी शिरुन संसारोपयोगी वस्तू भिजल्याने नुकसान झाले. याचे तातडीने पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. याकरीता याकरीता महसूल विभागाने तलाठ्यांचे पथक कार्यरत केले आहे. पंचनामे जवळपास पुर्ण झाले असून आता प्रतिक्षा अनुदानाची आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या ९ मे पासून कमी-अधिक प्रमाणात बेमोसमी पाऊस हजेरी लावत आहे. मंगळवारी दुपारी पडलेल्या दोन तासांच्या पावसाने लातूर शहरात दाणादाण उडवून दिली. सर्व रस्ते जलमय झाले होते.  घराघरात पाणी गेले. अनेकांच्या गृहोपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले. शहरातील सुमारे ४०० नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरुले. शहरातील इस्लामपुरा भागातील सुमारे ८०,  खाडगाव रस्ता भागातील १०, मोहननगरमधील ८०, उस्मानपूरामधील २०, सम्राट चौकातील २०, कोल्हेनगरमधील २०, अशा सुमारे ४०० घरांमध्ये अतिवृष्टीमुळे गटारीचे पाणी घरात शिरले होते.
राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी त्यांच्या सहकार्यासह मंगळवारी सायंकाळी अडचणीतील नागरिकांची भेट घेऊन पाहणी केली. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी  यांनी मदत करण्यास सुरुवात  केली.  बुधवारी दिवसभर नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येत होत्या. भर पावसात महानगरपालिकेच्या अधिका-यांनी पाणी शिरलेल्या ठिकाणांना भेटी देऊन तेथील पाणी काढण्याच्या सूचना केल्या. अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे केले असून आता प्रतिक्षा आहे ती अनुदानाची.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR