22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeनांदेडकिरकोळ वादातून नांदेडात एकाचा खून; चार तासात तिघे जेरबंद

किरकोळ वादातून नांदेडात एकाचा खून; चार तासात तिघे जेरबंद

नांदेड: प्रतिनिधी
वजीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये किरकोळ वादातून त्याच्या डोक्यात मारून एकाचा खुन केल्याची घटना मंगळवारी पाहटे उघडकीस आली याबाबत वजीराबाद पोलिसांनी चार तासात तिघांना ताब्यात घेतले आहे.

वजीराबाद पोलिस ठाण्याच्या समोर असलेल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळील पाण्याच्या टाकीजवळ बॉटल का दिली नाही म्हणून दोघांमध्ये वाद झाला. बाचाबाची वरून वाद वाढत गेला. यात संदीप गंगाराम मेटकर वाय ४० यांच्या डोक्यात मारल्यामुळे ते गंभीर जखमी झाले बे सुद्धा अवस्थेत पडल्यानंतर काही वेळानंतर त्यांचा मृत्यू झाला.घटणा सोमवारी रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान घडली. मंगळवारी पहाटे सदर घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी घटनास्थळी जाऊन सर्व माहिती घेतली.
संजय मेटकरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून चौकशी करून आरोपीला चार तासांमध्ये पकडले आहे.

त्यात लक्ष्मण गोविंद पवार, सुनील मेटकर. दिनेश मेटकर, सर्व रा. नांदेड तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेची चौकशी सुरू आहे. चौकशी अंतिम घटना कशामुळे घडली हे स्पष्ट होणार आहे. मृतदेह स्वविच्छेदनासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात त पाठविण्यात आला. वैद्यकीय आव्हाला नंतर सत्य उजेडात येणार आहे. पोलीस चौकशी करत असून मारण्याचे नेमके कारण कोणते आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
ताब्यात घेतलेल्या तिघांची चौकशी सुरू असून मंगळवारी त्याना अटक केली आहे या प्रकरणी वजीराबाद ठाण्यामध्ये तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिस कसुन चौकशी करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR