22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयकेजरीवालघेत नाहीत योग्य आहार; उपराज्यपालांनी पत्र लिहून व्यक्त केली चिंता

केजरीवालघेत नाहीत योग्य आहार; उपराज्यपालांनी पत्र लिहून व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात बंद आहेत. अलीकडेच आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीवर प्रश्न उपस्थित केला होता.

आता दिल्लीच्या उपराज्यपालांनी याबाबत मुख्य सचिवांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जाणूनबुजून योग्य आहार घेत नाहीत. तिहार तुरुंगाच्या अहवालाचा हवाला देत एलजी म्हणाले की, मुख्यमंत्री घरचा आहारही योग्य प्रमाणात घेत नाहीत. त्यामुळे त्यांचे वजनही कमी होत आहे. मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी तिहार तुरुंग अधिका-यांना डॉक्टरांनी सुचवलेला आहार घेण्यास सांगावे, असेही म्हटले आहे.

योग्य आहार न घेतल्याने अरविंद केजरीवाल यांचे तुरुंगात वजन कमी होत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. उपराज्यपालांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात नॉन-प्रिस्क्राईब वैद्यकीय आहार आणि औषधांच्या सेवनावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्याकडून याची कारणे शोधून काढली पाहिजेत, कारण त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो असेही उप राज्यपालांनी म्हटले आहे. कारागृह अधिकारी मा. मुख्यमंत्र्यांना आहारतज्ज्ञांनी ठरवून दिलेल्या आहाराव्यतिरिक्त औषध आणि इन्सुलिनच्या निर्धारित डोसचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देऊ शकतात, असे या पत्रात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR