गद्दारांच्या उरावर भगवा फडकविणार

ओमराजे वाघाची कातडी पांगरलेला लांडगा निघाला, ठाकरेंचा हल्लाबोल
धाराशिवमध्ये संवाद मेळावा
धाराशिव : प्रतिनिधी
खासदार फुटीच्या चर्चेवेळी सर्व खासदारांची आपण बैठक बोलावली. त्यावेळी ओमराजे मुलगा आजारी असल्याचे कारण सांगत गैरहजर राहिले. त्याचवेळी आपल्या मनात शंका निर्माण झाली. तरीही आपण त्याच्यासाठी शेवटपर्यंत फोन केला. यासाठी त्यांना आ. कैलासलाही भेटायला पाठवले. परंतु हा तर वाघाचे कातडी पांखरलेला लांडगा निघाला. आता तुमच्या उरावर भगवा फडकविल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी खासदार ओमराजे यांच्यावर केला. तसेच यावेळी त्यांनी सरकारवही जोरदार टीका केली.

धाराशिव येथे रविवारी (दि. २८) पदाधिका-यांशी संवाद मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खा. अनिल देसाई, आ. अंबादास दानवे, कैलास पाटील, आ. प्रवीण स्वामी, शंकराव बोरकर, सुनिल काटमोरे, मकरंद राजेनिंबाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती. ठाकरे पुढे म्हणाले की, कालपासून महाराष्ट्राच्या दौ-यावर फिरत असताना आज चित्र वेगळे दिसत आहे. त्यामुळे आता तुमचे नशीब फिरल्याशिवाय राहणार नाही. या सभा नसून कौटुंबिक बैठका आहेत. आता भगवा तुमच्या उरावर फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही.

मागच्या २०२२ च्या गद्दारीवेळी आ. कैलासच्याही पायी संपत्तीची रास पडली होती. तरीदेखील त्याने ते सगळे लाथाडून शिवसेनेशी इमान राखत शिवसैनिक कसा असावा, हे दाखवून दिले. गाड्यांमधून आमदार घेऊन जात होते, त्यावेळी कैलासने मला फोन करून या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. तेव्हा कैलास सुरतच्या बॉर्डरवरून गाडीतून उडी टाकून पायी चालत आला. तेव्हाही कैलासच्या पायाशी संपत्तीची रास व खोक्यांचे आमिष होतेच. पण ते सगळेच त्याने लाथडले, हाच खरा शिवसैनिक आहे.

सरकारकडे बहुमत असतानासुद्धा यांनी आमदार फोडले, पक्ष-चिन्ह घेतले. तरीदेखील नवीन चिन्ह घेवून आपण तुमच्या मदतीने उभारलो. यांना महाराष्ट्र संपवण्यासाठी शिवसेना फोडायची आहे. ठाकरे संपावायचे आहेत. महाराष्ट्रातील उद्योग-धंदे गुजरातला न्यायचे आहेत. आज या ठिकाणी एकही उद्योग आणला नाही, अशी टीका करतानाच तुमच्या कितीही पिढ्या संपल्या तरी शिवसेना संपणार नाही, असे ठाकरे म्हणाले. शिवसैनिक हिच आमची संपत्ती आहे. जोपर्यंत तुम्ही आहेत. तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. या गद्दारानी सरकार पाडले नसते तर आपण कर्जमुक्ती केली असती, असेही ते म्हणाले.

यापूर्वी आमदार फोडले, आता खासदार फोडले आणि म्हणाले शिवसेना संपली. उध्दव ठाकरे यांना पक्ष चालवता येत नाही. मग तिकडे ममतांचा पक्ष, आम आदमी पक्ष का फोडला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हे राजकारण देशासाठी घातक असून हे सर्व पंतप्रधानांच्या खुर्चीसाठी चालू असल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले.

गद्दारी न करण्याची
ग्वाही देऊन पळाला
ओमराजे माझ्या शेतक-यांच्या कष्टाच्या पैश्यावर निवडून आला. पुढे पैश्याचा पाऊस सुरू असताना शेतक-यांनी त्यास निवडून आणले. यावेळी त्याने माझ्या सभेत गद्दारी करणार नसल्याची उदाहरणेही दिली. मात्र, त्यानेच आता गद्दारी केली. स्वत:चे पाप झाकण्यासाठी तो तिकडे गेला. याचे आधी प्रकरण कळाले असते तर त्यास संधी दिली नसती. परंतु ती माझी चूक झाली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यात शेतक-यांचे
वाटोळे करणारे सरकार
राज्यात सध्या अंदाधुंदी माजली आहे. आपले सरकार असताना आपण कर्जमुक्ती दिली होती. मात्र आता गुन्हेगारांना माफी देण्यात येते. त्याप्रमाणे कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले. मात्र, कर्जमाफी नाही. पीककर्ज नाही, हमीभाव नाही, हे सरकार शेतक-यांचे वाटोळे करणारे सरकार आहे आणि हे गद्दार या सरकारकडे गेले आहेत ते त्यांच्या स्वार्थासाठी गेले आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला. आता हे चार्टर्ड विमानाने फिरत आहेत. त्याच्याकडे एवढा पैसा आला कुठून, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री फडणवीस
यांची खुर्चीही धोक्यात
आज जे गद्दार गुलाम सेनेत गेले त्यांचे भवितव्य आहे का, कदाचित मुख्यमंत्री फडणवीस यांची खुर्र्ची गेली तर नवल वाटायला नको. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान हे लोकप्रिय होते. ते भविष्यात पंतप्रधान होतील, या भीतीपोटी त्यांना कुठे पाठवले, तशीच परिस्थिती महाराष्ट्रातील भाजपा नेते नितीन गडकरी यांची केली. आता देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी या गद्दारांना पुढे केले जात आहे. त्यामुळे खासदारांना फोडल्याची त्यांची चिंता वाढली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news