पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या (एसएससी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेचा निकाल शुक्रवार दि. ८ मे रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातून दहावीच्या निकालात ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल २ टक्क्यांनी घसरला आहे. मुलींचा निकाल ९४.९६ टक्के तर मुलांची ९०.५६ टक्केवारी आहे. यंदा दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७. ६२ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ८८.४१ टक्के लागला आहे. कोकण विभागातून सर्वाधिक ९७.६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर च कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५५,०२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४२,४७२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी १४,२०,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व त्यांची एकूण उत्त्तीर्णतेची टक्केवारी ९२.०९ आहे. राज्यातून ६ हजार ६१२ शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर ४ लाख ८२ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे.
राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक ८२ कॉपीचे प्रकरण उघडकीस आली आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ७१ अमरावती ६७, नागपूर ४६, मुंबई ४४ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत तर लातूर आणि पुण्यात ४२ तर कोल्हापूर आणि कोकण विभागात ४ प्रकरणे समोर आली आहेत.
विभागनिहाय टक्केवारी
कोकण:९७.६२ टक्के
पुणे: ९४.२४ टक्के
नागपूर: ८९.०७ टक्के
मुंबई: ९४.९७ टक्के
कोल्हापूर: ९५.४७ टक्के
अमरावती: ९०.५० टक्के
नाशिक: ९०.५३ टक्के
लातूर: ८८.४२ टक्के
छत्रपती संभाजीनगर: ८८.४१ टक्के
राज्यात एकूण ४०२ कॉपीचे प्रकार

