चाकूर : प्रतिनिधी
चाकूर तहसील कार्यालयाची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सहकारमंत्री ना.बाबासाहेब पाटील यांनी सन्मान करून तहसीलच्या संपुर्ण टीमचे अभिनंदन केले. शासनाच्या शंभर दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रम संदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेल्या कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागात तहसिल कार्यालय चाकूरने उत्कृष्ट कामगिरी करून तिसरा क्रमांक मिळविला. याबद्दल तहसिलदार नरसिंग जाधव यांचे अभिनंदन करून महाराष्ट्राचे सहकारमंत्री ना.बाबासाहेब पाटील यांनी शाल ,श्रीफळ देऊन सन्मान केला. शेतकरी फार्मर आयडी शिवाय शासनाच्या विविध योजना मिळणार नाहीत. यामुळे तालुक्यात व्यापक प्रमाणात ही योजना राबवली व यशस्वी केली. तालुक्यात जवळपास ३००००/ हजार शेतक-यांनी आपला शेतकरी ओळखपञ काढला आहे.६८ टक्के शेतक-यांच्या ओळखापञ काढले आहेत.
जिल्हात प्रथम क्रमांकवर शेतकरी ओळखपञ नोंदणी चाकुर तालुका आहे. तहसिलदार नरसिंग जावध यांनी शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय यंञणेचा सुक्षमपणे व नियोजित वापर करुन योजनांचा प्रभावीपणे अंमलबजावणी केली. संगायो योजना, शेतकरी फार्मर आयडी, ई-केवायसी,शेत रस्ते, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्र वेळेत वाटप, ई-ऑफिस प्रणाली, कार्यान्वित करण्यात आली, जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात आली आहे, संजय गांधी निराधार योजनेच्या ९२ टक्के लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले आहे. सस्ती आदालतीचे आयोजित करण्यात आली, तक्रारी फेरफार मुदतीच्या आत नर्गित करण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर तालुक्यातील सर्व मंडळांत घेऊन सुलभ प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले, तसेच अॅग्रस्टिॅक नोंदणी, शिधापत्रिका केवायसी, आधार नोंदणी, पुरवठा विभागाकडून शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या.
ई शिधाप्रञिकेचे वाटप करण्यात आले. तसेच, कार्यालयीन स्वच्छता व इतर कामांची दखल घेण्यात आली आहे. नायब तहसीलदार दिगंबर स्वामी, शैलेश निकम, संतोष धाराशिवकर, पुरवठा निरीक्षण अधिकारी अफसाना मुल्ला, सहायक महसूल अधिकारी अनिल कचरे, बालाजी इंगळे, संजय कासराळीकर, विष्णू तोंडारे, आनंदा धनेश्वर, ग्राम महसूल अधिकारी अविनाश पवार, प्रशांत तेरकर, परमेश्वर वैद्य, बी.यू. पाटील, विश्वनाथ हाके, गणेश गोलावार, कृष्णा देवरवाडे, निवृत्ती हालसे यांनी परिश्रम घेतले आहेत.