25.1 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeराष्ट्रीयचेंगराचेंगरीत ११६ भाविक ठार

चेंगराचेंगरीत ११६ भाविक ठार

सत्संगात भीषण दुर्घटना, मृतांमध्ये सर्वाधिक महिला
हाथरस : प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११६ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. हाथरसमध्ये झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. सत्संगात ही भीषण दुर्घटना घडली. भोलेबाबांचे प्रवचन ऐकण्यासाठी हाथरस एटा सीमेजवळील रतिभानपूर येथे मोठ्या संख्येने लोक जमले होते. मृतांमध्ये सर्वाधिक महिलांची संख्या आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे.

सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत ११६ हून अधिक जणांनी जीव गमावल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या जास्त आहे आणि अद्यापही अनेक जण बेशुद्ध अवस्थेत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून संपूर्ण घटनेचा अहवाल मागवला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, हाथरसचे डीएम आशिष कुमार यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे. जखमींना रुग्णालयात नेले असून, उपचार सुरू आहेत. या कार्यक्रमासाठी उपविभागीय दंडाधिका-यांनी परवानगी दिली होती आणि हा एक खाजगी कार्यक्रम होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानी अत्यंत दु:खद आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. माझ्या संवेदना दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांसोबत आहेत. संबंधित अधिका-यांना मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे सांगितले.

मंडपातून बाहेर
पडताना चेंगराचेंगरी
सत्संग मंडपातील उष्णतेमुळे लोक बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुघर्टनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलिस प्रशासन आणि रुग्णवाहिका पोहोचण्यास बराच विलंब झाला. स्थानिक लोकांनी जखमींना जवळच्या हॉस्पिटल आणि एटा हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR