23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरजिल्ह्यातील ‘अंगण’ होणार स्वच्छ

जिल्ह्यातील ‘अंगण’ होणार स्वच्छ

लातूर : प्रतिनिधी
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत जिल्हयातील सर्व गावांमध्ये स्वच्छ माझे अंगण अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाची सर्व गावांमध्ये कुटुंब पातळीवर प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले आहे.

वैयक्तिक शौचालय, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन (कुटुंबस्तर) राबवित असलेल्या गावातील सर्व कुटुंबस्तरावर या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी. नित्य नियमाने स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगीकृत करण्यासाठी जे कुटुंब वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापनकरिता शोषखड्डा, परसबाग, पाझरखड्डा, घनकचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्ट अथवा घरगुती खतखड्डा आणि कुटुंबस्तरावर कचराकुंड्या याबाबतची उपलब्धता करून घेतली आहे. त्यांचा नियमितपणे वापर करतात अशा कुटुंबाना प्रोत्साहन देणे. त्यांचे अनुकरण करण्यासाठी अन्य ग्रामस्थ, कुटुंबधारकांना त्यांच्याप्रमाणेच वैयक्तिक स्वरुपांच्या स्वच्छतेच्या सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी स्वच्छ माझे अंगण हे अभियान राबविणेत येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR