25.4 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeलातूरतीन वर्षापुर्वीही ‘नीट’ परीक्षा ‘नीट’ नव्हतीच!

तीन वर्षापुर्वीही ‘नीट’ परीक्षा ‘नीट’ नव्हतीच!

लातूर : प्रतिनिधी
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘नीट २०२४’ पेपरफु टी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहचल्याने लातूरचे नाव देशभरात चर्चेला आले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिट यांचेकडून पेपरफु टीच्या नवीन कायद्यानुसार ४ आरोपी विरोधात गुन्हा दाखल असतानाच सन २०२१ मध्ये झालेल्या ‘नीट’ परीक्षा पेपर लिक प्रकरणातील एका व्यक्तीने या घोटाळा प्रकरणात आपणास माफीचा साक्षीदार करवून घ्यावे, अशी विनंती केल्याने तीन वर्षापुर्वीही वैद्यकीय प्रवेश पुर्व परिक्षा ‘नीट’ नव्हती हे सिद्ध होत असून आता हे ही प्रकरण तपास यंत्रणेच्या ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
मागच्या आठवड्यात लातूरात दाखल झालेल्या दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिटने लातूरातील संजय तुकाराम जाधव व जलीलखाँ उमरखान पठाण या दोन शिक्षकांना ताब्यात घेऊन त्यांची या प्रकरणी चौकशी करुन सोडून दिले होते.

मात्र रविवारी रात्री उशिरा याच लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिट यांचेकडून पेपरफुटीच्या नवीन कायद्यानुसार या दोन शिक्षकासह धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआय शिक्षक ईरन्ना मष्णाजी कोनगलवार मुळ रा. देगलूर, जि. नांदेड व दिल्ली येथील गंगाधर नामक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील चार संशयीत आरोपी पैकी जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेल्या संजय तुकाराम जाधव व जलीलखाँ उमरखान पठाण यांना पोलीसांनी गजाआड केले असून ते सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहेत. तर या गुन्ह्यात मुख्य सुत्रधार असलेला सध्या लातूर शहरात वासत्व्यास असलेला व मुळ रा. देगलूर, जि. नांदेडचा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआय शिक्षक असलेला ईरन्ना मष्णाजी कोनगलवार हा आपल्या कुटूंबासह फरार आहे. तर दिल्लीच्या गंगाधर नामक आरोपीला सीबीआयने ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

असे असतानाच लातूर शहरातील एका संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी २०२१ च्या ‘नीट’ परीक्षेत पेपर फोडून कोट्यावधीचा घोटाळा केला व त्यावेळी थातूर-मातूर पद्धतीने चौघांचा जबाब घेऊन प्रकरण संपुष्टात आणण्यात आले. पण, आपणास हा प्रकार आवडला नाही. २०२१ च्या परीक्षा पेपर लिक प्रकरणी आपणाकडे मिनिट-टू-मिनिट पुरावे आहेत. त्या पुराव्यास मला सरेंडर करुन घ्यावे या प्रकरणात मला माफीचा साक्षीदार घोषीत करावे, अशी लेखी विनंती २६ जून रोजी जिल्हाधिकारी यांच्यापासून राष्ट्रपतींपर्यंत तसेच प्रमुख नेत्याकडे या संस्थेतील ऐका कर्मचा-याने केली आहे. त्यावर प्रशासनाकडून काय पावले उचलली हे मात्र समजू शकले नाही. तक्रारकर्त्या व्यक्त्ती त्या संस्थेतील पदाधिकारी असून तो संस्थेत कार्यरत होता. याबाबत दूध का दूध, पाणी का पाणी होण्याची अपेक्षा व्यक्त्त करण्यात येत आहे. त्यावेळपासून या प्रकरणी हा व्यक्त्ती पाठपुरावा करित आहे. पण, त्याची दखल घेतली जात नाही. हे मात्र विशेष आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR