30 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeमुख्य बातम्यानव-यांनी फसविलेल्या दोन मैत्रिणींचे एकमेकींशी लग्न

नव-यांनी फसविलेल्या दोन मैत्रिणींचे एकमेकींशी लग्न

बदायूं : वृत्तसंस्था
बदायूंमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. शिवमंदिरात दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं आहे. आम्ही कायदेशीररित्या लग्न करू शकत नसलो तरी, आता आम्ही आयुष्यभर पती-पत्नी म्हणून एकत्र राहू. आम्ही पुरुषांचा तिरस्कार करतो म्हणूनच आम्ही हे पाऊल उचलत आहोत असे तरुणींनी म्हटले आहे. बदायूं येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ही घटना घडली.

दोन तरुणी वकील दिवाकर वर्मा यांच्या चेंबरमध्ये पोहोचल्या. त्यांनी एकमेकींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही मैत्रिणी आहोत आणि जवळजवळ ३ महिन्यांपासून एकत्र राहत आहोत. आम्हाला दोघींनाही आयुष्यभर पती-पत्नी म्हणून एकत्र राहायचे आहे असे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शिव मंदिरात दोन्ही मुलींनी एकमेकींना हार घालून लग्न केलं आहे.
आम्हाला पुरुषांचा तिरस्कार : लग्न करणा-या तरुणी म्हणतात की, आम्ही पुरुष समाजाचा तिरस्कार करतो आणि आम्हाला एकमेकींसोबत आयुष्य घालवायचं आहे. कायद्याने लग्न करण्याची परवानगी दिली नसली तरी मंदिराच्या आवारात लग्न केलं आहे. कुटुंबातील सदस्यांनी आमच्याशी नातं ठेवलं नाही तरी काही हरकत नाही. आम्ही दोघीही आयुष्यभर एकमेकींना आधार देत राहू. हिंदू असल्याचे भासवून मुस्लिम तरुणांनी दोघींनाही फसवलं आहे. म्हणूनच आम्ही पुरुषांचा तिरस्कार करतो. आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला आहे, असे या दोघी म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR