24.8 C
Latur
Monday, July 8, 2024
Homeमहाराष्ट्रफोडाफोडीचा खेळ पुन्हा रंगणार

फोडाफोडीचा खेळ पुन्हा रंगणार

विधानपरिषद निवडणूक, ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात

मुंबई : प्रतिनिधी
विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने अंतिमत: ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उरले असून फोडाफोडीचे राजकारण आणि मतांचा घोडेबाजार रंगणार हे आज स्पष्ट झाले. काँग्रेस वगळता सर्वच पक्षांना आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी बाहेरून मतांची तजवीज करावी लागणार असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. ही निवडणूक गुप्त मतदानाने होत असल्याने सगळ््यांनाच आमदार फुटण्याची धास्ती आहे.

विधानसभेतून विधानपरिषदेवर पाठवण्यात येणा-या ११ जागांसाठी १२ जुलैला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने ९ तर महाविकास आघाडीने तीन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न झाले. पण कोणीच माघार न घेतल्याने निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. विधानसभेतील २८८ पैकी १४ जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे १७४ आमदार या निवडणुकीत मतदान करणार असून, विजयासाठी २३ (२२.८४ ) आमदारांचे पाठबळ लागणार आहे. विधानसभेत सध्या भाजपाचे १०३, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ३९, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४०, काँग्रेसचे ३७, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे १५ व राष्ट्रवादीच्या पवार गटाचे १२ आमदार आहेत. याशिवाय अपक्ष व छोट्या पक्षांचे २८ आमदार आहेत. काँग्रेसकडून केवळ प्रज्ञा सातव या एकमेव उमेदवार असल्याने त्यांना इतरांच्या मदतीची आवश्यकता नाही.

काही मते फुटली तरी त्या निवडून येऊ शकतील अशी स्थिती आहे. काँग्रेसने आपली अतिरिक्त मते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांना देण्याचे मान्य केले आहे. खबरदारी म्हणून पहिल्या पसंतीची सर्व मते प्रज्ञा सातव यांना देऊन दुसरी पसंती नार्वेकर यांना दिली जाईल. तसे झाल्यास १० ते १२ मते नार्वेकर यांना मिळतील. ठाकरे गटाची स्वत:ची मते व काँग्रेसकडून मिळालेल्या अतिरिक्त मतांच्या आधारे नार्वेकर यांची नैया पार होऊ शकते.

भाजपकडे स्वत:ची १०३ मते आहेत. भाजपाच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यासाठी त्यांना ११५ आमदारांचे पाठबळ लागणार आहे. म्हणजेच १२ मते बाहेरून मिळवावी लागतील. शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. त्यासाठी त्यांना ७ अतिरिक्त मते लागतील. राष्ट्रवादी अजित पवार गटाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनाही ६ मतांची तजवीज करावी लागणार आहे. त्यामुळे या सर्वांची मदार बाहेरून किती मते मिळतात यावर आहे.

अपक्ष सोबत राहतील
याची शाश्वती नाही
भाजपला पूर्वी ९ अन्य आमदारांनी पाठिंबा दिला होता. पण बदललेल्या राजकीय परिस्थितीत ते सर्व बरोबर राहतील, याची शाश्वती नाही. शिंदे यांच्या शिवसेनेचीही हीच स्थिती आहे. दोन वर्षांपूर्वी बंड केले तेव्हा बच्चू कडू यांच्यासह १० अन्य आमदार त्यांच्यासोबत होते. ते आजही कायम असतील, याचा भरवसा नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR