30.7 C
Latur
Saturday, April 26, 2025
Homeलातूरभाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात 

भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात 

लातूर : प्रतिनिधी
मागील काहीं दिवसापासून शहरातील कृषी उत्पन्न बाजार समित  भाजीपाल्याची आवक काहीं प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येत आहे. मागील काहीं दिवसापुर्वी बाजार समितीत भाजीपाल्याची आवक कमी-जास्त प्रमाणात होत होती. मात्र सध्या बाजार समितीत आवक वाढण्यास सुरूवात झाली आहे. गत आठवड्याच्या तूलनेत शनिवार बाजार समितीत ६९८ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली आहे. सध्या बाजार समितीत येणारा भाजीपाला चांगल्या प्रतिचा असला तरी त्याला अगदी कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग मात्र चिंतेत पडला आहे.
शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीत ग्रामीण भागासह शेजारील जिल्ह्यातून तसेच शेजारी राज्यातून भाजीपाल्याची मोठया प्रमाणावर आवक होते. गेल्या दोन महिन्यापासून बाजार समितीत भाजीपाल्याची आवकही काहि प्रमाणात कमि-जास्त होत आहे. गत आठवड्याच्या तूलनेत शनिवार बाजार समितीत पुन्हा भाजीपाल्याची आवक वाढली असल्याचे दिसून आले आहे. सध्या बाजार समितीत येणारा भाजीपाला चांगल्या प्रतिचा असला तरी त्याला अगदी कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग मात्र चिंतेत पडला आहे. उच्च प्रतिचा भाजीपाला बाजारपेठेत येत असल्याने भाजीपाल्याच्या दरात काहि प्रमाणात भाववाढ झाली असल्याचे आडत व्यापा-यांनी सागीतले. परंतु काही दिवसांपूर्वी काहि भाज्यांची आवक वाढल्यामुळे त्यांच्या दरातही घसरण होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता.
मात्र, गेल्या आठवड्यापासून मागणीच्या तुलनेत काही भाज्यांची आवक पुरेशा प्रमाणात होत नसल्याने अवघ्या काहीच दिवसांत पुन्हा किरकोळ भाज्यांचे दर वाढले आहेत. शहरातील किरकोळ बाजारात मिरची, गवार, कारले, दोडका, मेथी या भाज्यांच्या दरात मात्र वाढ घाली आहे. बाजारात भेंडी, टमोटो, काकडी, मेथी, पालक, फ्लॉवर आदी दैनंदिन भाज्यांना मोठी मागणी असते. परंतु याच भाज्यांची आवक घटल्याने शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडे भेंडी, टमोटो, काकडी, मेथी, पालक, फ्लॉवर आदी भाज्या ३० ते ५० रुपये प्रतिकिलो विकली जात आहे. तर काहि भाज्या अगदी कवडी मोल भावात विक्री केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे.
शहरातील बाजार समितीत  वागें ११ क्विंटलची आवक होवून २०० रुपयांचा दर मिळाला, भेंडी १५ क्विंटलची आवक होवून १५० रुपयांचा दर मिळाला, पत्ता गोभी १६ क्विंटलची आवक होवून ४० रुपयांचा दर मिळाला, फुल गोभी ३२ क्विंटलची आवक होवून २०० रुपयांचा दर मिळाला, टमाटे गावराण ६७ क्विंटलची आवक होवून ७० रुपयांचा दर मिळाला, वैशाली टमाटे १०० क्विंटलची आवक होवून ७० रुपयांचा दर मिळाला, गवार ३ कव्टिंल आवक होवून ४०० रुपयांचा दर मिळाला, भोपळा ९ क्विंटलची आवक होवून ९० रूपयांचा दर मिळाला, हिरवी मिरची १२० क्विंटलची आवक होवून २४० रुपयांचा दर मिळाला, वैशाली मिरची ३७ क्विंटलची आवक होवून २६० रूपयांचा दर मिळाला, दोडका ८ क्विंटलची आवक होवून ३०० रूपयांचा दर मिळाला, पालक ९ क्विंटलची आवक होवून २२० रूपयांचा दर मिळाला,
शेपू १ क्विंटलचीआवक होवून २४० रुपयांचा दर मिळाला, कोथिंबीर ८९ क्विंटलची आवक होवून १५० रुपयांचा दर मिळाला, मेथी १२ क्विंटलची आवक होवून ५०० रुपयांचा दर मिळाला, कांदापात २ कव्टिंल आवक होवून १५०० रुपयांचा दर मिळाला, लिंबू १२ क्विंटलची आवक होवून ७०० रुपयांचा दर मिळाला, शेवगा ९४ क्विंटलची आवक होवून १५० रुपयांचा दर मिळाला, काकडी २६ क्विंटलची आवक होवून १५० रुपयांचा दर मिळाला, कारले ४ क्विंटलची आवक होवून २४० रुपयांचा दर मिळाला, भुयमुग ७ क्विंटलची आवक होवून ४४० रुपयांचा भाव मिळाला आहे. शहरातील बाजार समितीत शनिवार सौवद्यात एकुण ६९८ क्विंटलची आवक झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR