22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयमाझ्या ९ मुलांची नितीशकुमारांना काय अडचण?

माझ्या ९ मुलांची नितीशकुमारांना काय अडचण?

पाटणा : वृत्तसंस्था
नितीशकुमार यांना एकुलता एक मुलगा आहे. तोही ते सांभाळू शकले नाहीत. आमची मुले तर चांगले काम करत आहेत. नितीशकुमार निवडणूक प्रचारादरम्यान शिवीगाळ करत आहेत.

आम्हाला ९ मुले आहेत, तर त्यांना काय अडचण आहे? असा प्रतिहल्ला प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विधानावर केला. बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात वैयक्तिक पातळीवर टीका झाली. नितीशकुमार यांनी राबडीदेवींच्या नऊ मुलांबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. राबडीदेवी म्हणाल्या की, आमच्या कुटुंबाने राज्य चालवले आहे, हे त्यांना कळायला हवे. गरज पडली तर आम्ही देशही चालवू शकतो.

राजदचे नेते तेजस्वी यादव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:चे मार्केटिंग करण्यासाठी कन्याकुमारी येथे गेले आहेत. ध्यानधारणा करताना अडथळे येतील, अशा कोणत्याही गोष्टी त्यांनी करू नयेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे भाजपबरोबर नीट जमत नाही. त्यांच्यात अजिबात समन्वय नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकांनंतर बिहारमध्ये काहीतरी वेगळेच चित्र पाहायला मिळणार असल्याचा दावा तेजस्वी यादव यांनी केला. बिहारचे राज्यपाल हे सध्या अधिका-यांच्या बैठका घेत असून, त्यात विविध निर्णय घेतले जातात, असे मी ऐकून आहे. भाजप व जनता दल (यू) यांच्यात समन्वय दिसत नाही असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR