22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमी निराश नाही, पराभवाची जबाबदारी स्वीकारली : फडणवीस

मी निराश नाही, पराभवाची जबाबदारी स्वीकारली : फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवारी) भाजपच्या विधीमंडळाच्या बैठकीत बोलत असताना निवडणूक निकालाचे संपूर्ण गणित समजून सांगितले. भाजपचा पराभव का झाला याबाबत ही त्यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, एक विशिष्ट नेरेटिव्ह तयार करण्यात आलं ज्यामुळे भाजपचा पराभव झाला.

एकीकडे याचा आनंद आहे, देशातील लोकांनी मोदींवर विश्वास दाखवला. २०१४ आणि २०१९ आपला स्ािंहाचा वाटा होता. पण यंदा आपण तसं करु शकलो नाही. नव्याने आपल्याला रणनीती आखता यावी यासाठी आजची बैठक महत्त्वाची आहे.

‘उन्हाळा संपतोय. पावसाळा जवळ आलेला आहे. पाऊस पडल्यानंतर जे पेरलं जात तेच नंतर उगवतं. आता नव्याने पेरण्याची वेळ आली आहे. यशाचे बाप अनेक असतात पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असते. नवीन निर्धार करायचा असतो. मी या अपयशाची जबाबदारी घेतली. पॉलिटिकल अर्थमेटिकमध्ये कमी पडलो. देवेंद्र फडणवीस पळणारा व्यक्ती नाही. आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे. कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो तर ते सत्य नाही. मी अमित शाहांना भेटून आलो आहे. त्यांना माझी भूमिका सांगितली. त्यांनी सांगितलं आपण महाराष्ट्राची ब्लूप्रिंट तयार करु.’

मुंबईत त्यांना २४ लाख मते आहेत आपल्याला २६ लाख मते मिळाली आहेत. पण त्यांना ४ जागा मिळाल्या आपल्याला २ जागा मिळाल्या. आपण खोट्या नरेटिव्ह सोबत लढत होतो. हा चौथा पक्ष होता. त्याला आपण रोखू शकलो नाही. संविधान बदलणार असं पसरवलं गेलं. दलित, आदिवासी समाजात हा नरेटिव्ह तयार झाला. असा नरेटिव्ह एखाद्या निवडणुकीसाठी असतो. खोटा मुद्दा एका निवडणुकीपर्यंत मर्यादित असतो. जेव्हा जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा मोदींनी आधी संविधानाची पूजा केली आहे.

मराठा आरक्षण भाजपने दिलं,
मते विरोधकांना गेली
पक्ष फोडाफोडीवरुन दुसरा नरेटिव्ह तयार करण्यात आला. मराठा समाजाने नरेटिव्ह तयार केलं. भाजपने त्यांना आरक्षण दिलं. सवलतीची योजना, हॉस्टेलची योजना आपल्या काळात देण्यात आली. ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना मते गेली. याचा अर्थ असा की हे पण टिकणार नाही. काही प्रमाणात ते यशस्वी झाले. पण आपली मतं कमी झालेली नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR